शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

दापोली तालुक्यातील कवी केशवसुतांचे घर भग्नावस्थेत,  वळणे गावातील स्मृती कायम राहण्यासाठी प्रयत्न गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 11:46 IST

चातुवर्ण्य व्यवस्थेचा पगडा असणाऱ्या काळात  ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, ना मी एक पंथाचा, तेच पतित की, जे आखडती प्रदेश साकल्याचा, अशी वैचारिक क्रांतीची काव्यसुमने लिहिणऱ्या कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कवी केशवसुत यांचे वळणे (ता. दापोली) येथील घर सध्या भग्नावस्थेत आहे. केशवसुतांना ज्याठिकाणी काव्यसंपदा स्फुरली, त्या वळणे गावात केशवसुतांची स्मृती कायम राहण्यासाठी या घराची दुरुस्ती करून त्याचे जतन करावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

ठळक मुद्देवैचारिक क्रांतीची काव्यसुमने लिहिणाऱ्या कवी केशवसुत यांचे वळणे येथे घर निसर्गरम्य परिसराने केशवसुतांच्या मनातील काव्यप्रतिभा जागृत आधुनिक कवितेचे जनक म्हणून कवी केशवसुत यांची ओळख

दापोली : चातुवर्ण्य व्यवस्थेचा पगडा असणाऱ्या काळात  ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, ना मी एक पंथाचा, तेच पतित की, जे आखडती प्रदेश साकल्याचा, अशी वैचारिक क्रांतीची काव्यसुमने लिहिणऱ्या कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कवी केशवसुत यांचे वळणे (ता. दापोली) येथील घर सध्या भग्नावस्थेत आहे. केशवसुतांना ज्याठिकाणी काव्यसंपदा स्फुरली, त्या वळणे गावात केशवसुतांची स्मृती कायम राहण्यासाठी या घराची दुरुस्ती करून त्याचे जतन करावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.विषय आणि अभिव्यक्ती या सर्वार्थाने आधुनिक कवितेचे जनक ठरलेल्या कवी केशवसुतांचे दापोली तालुक्यात दाभोळ मार्गावर वळणे हे गाव आहे. केशवसुतांच्या काव्यप्रतिभेची खरी सुरुवात याच वळणे गावातून झाली. केशवसुतांचे जन्मगाव हे रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड असले तरी दापोली येथील वळणे येथे काहीकाळ त्यांचे वास्तव्य होते.

निसर्गरम्य वळणे गावातून शांतपणे वाहणारी नदी, तेथील केवड्याचे बन, नारळी, पोफळी, आंबा, काजू आणि विविध प्रकारच्या झाडांनी नटलेल्या रम्य परिसराने केशवसुतांच्या मनातील काव्यप्रतिभा जागृत होऊन कवितांनी आकार घेतला. या काव्यांचा सुगंध सर्वदूर दरवळला. मात्र, केशवसुतांचे वास्तव्य असलेले वळणे गावातील हे घर सध्या भग्नावस्थेत असून, सद्यस्थितीत घराच्या पडलेल्या भिंती व घराच्या जोत्याचे अवशेषच फक्त शिल्लक राहिले आहेत.

वळणे येथील केशवसुतांच्या घराच्या दुरुस्तीबाबत कवी मधुमंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष असताना प्रयत्न केले होते. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आजच्या घडीला याठिकाणी फक्त आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत.

दापोलीमध्ये येणाऱ्या साहित्यप्रेमी पर्यटकांना आद्यकवी केशवसुत यांचे वळणे गावातील घर पाहण्याची इच्छा असते. मात्र, दुर्दैवाने आज हे घर जमीनदोस्त झाल्यामुळे पर्यटकांची घोर निराशा होते. 

स्मृती जपणे गरजेचेमालगुंड या केशवसुतांच्या जन्मगावी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रयत्नाने कवी केशवसुतांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी आणि नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी एक वेगळेपण असलेले स्मारक उभारण्यात आले आहे. मराठी साहित्य अजरामर केलेल्या तुतारीकार केशवसुतांच्या स्मृती जपण्यासाठी वळणे (ता. दापोली) येथील भग्नावस्थेत असलेले केशवसुतांचे घर दुरुस्त करून स्मारक उभारल्यास साहित्यप्रेमी पर्यटकांना एक नवे दालन खुले होईल.- प्रशांत परांजपे,केंद्रीय कार्यवाह, कोमसाप.

टॅग्स :literatureसाहित्यRatnagiriरत्नागिरी