शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
2
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
3
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
4
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
5
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
6
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
7
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
8
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
9
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
10
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
11
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
12
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
13
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
14
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
16
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
17
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
18
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
19
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
20
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?

कासवांच्या गावातील पर्यटन विकासाला राजाश्रयाची गरज, वेळास गाव आजही दुर्लक्षितच 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 7:07 PM

मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष

प्रशांत सुर्वेमंडणगड : कासवांचे गाव म्हणून ओळख निर्माण केलेले तालुक्यातील वेळास गाव आजही पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षितच राहिले आहे. कासव महाेत्सव हाेताे कधी, संपताे कधी याची माहितीच दिली जात नसल्याने कासव महाेत्सवानिमित्त येणाऱ्या पर्यटकांची प्रतीक्षाच आहे. तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या वेळास गावाला राजाश्रयाची गरज असून, वेळास गावाचे ‘ब्रॅण्डिंग’ हाेणे गरजेचे आहे.तालुक्याला लाभलेल्या निसर्गसौंदर्याला व येथील वातावरणाला मुंबई, पुणेसारख्या शहरवासीयांनी ‘सेकंड होम’ म्हणून पसंती दर्शवली आहे. मात्र, तालुक्यातील पर्यटनस्थळाचे ‘ब्रॅण्डिंग’ न झाल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. कासवांचे गाव म्हणून वेळास पर्यटकांच्या नकाशावर आले. मात्र, त्याची प्रसिद्धी न झाल्याने पर्यटक फिरकत नाहीत.कासव महाेत्सवासंदर्भात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व पर्यटन विभागाकडून कोणतीच प्रसिद्धी केली जात नाही. त्यामुळे या महाेत्सवाबाबत वेळासवगळता तालुक्यातील जनता दूरच आहे. इच्छा असूनही अनेक निसर्ग, पर्यावरण व प्राणीप्रेमींना कासवांचा जन्मोत्सव पाहता येत नाही. पर्यटकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला लाखो रुपये उत्पन्न मिळत असले तरी ग्रामपंचायत स्तरावरून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे निसर्गसाैंदर्य असूनही पर्यटनाच्या दृष्टीने तालुका मागेच राहिला आहे.

मुलभूत सुविधांकडे दुर्लक्षसमुद्रकिनारी स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधाही नाही. या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. मंडणगड तालुक्यातील एकमेव असलेल्या या पर्यटन केंद्राकडे शासनानेच वेळीच लक्ष देणेे गरजेचे आहे.

पर्यटक थांबू शकतीलयेणाऱ्या पर्यटकांना बाणकोट किल्ला, डाॅ. बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे, मंडणगड किल्ला, पणदेरी लेणी, केशरनाथ मंदिर यांसारख्या पर्यटनस्थळांना भेट देता येऊ शकेल. त्यामुळे तालुक्यात आलेला पर्यटक एक दिवस तालुक्यात थांबवणे शक्य होणार आहे.

महाेत्सवाबाबत अनभिज्ञमहाेत्सवाबाबत प्रशासकीय अधिकारी ते लोकप्रतिनिधी यांना याबाबत कोणतीच कल्पना नाही. किती वर्षांपासून कासव महाेत्सव सुरू आहे? किती घरटी संरक्षित केली? किती पर्यटक येतात? त्यांची व्यवस्था काय अशा अनेक प्रश्नांबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी नि:शब्द होतात.

हाेम - स्टे संकल्पनागावात हाॅटेलला एकमताने विरोध करत ‘होम-स्टे’ संकल्पना राबविण्यात आली. या माध्यमातून रोजगारही उपलब्ध झाला. हाच पॅटर्न इतर ठिकाणी राबवल्यास पर्यटनास चालना मिळेल.

कासव संवर्धन२००२ साली कासव संवर्धनाकरिता प्रयत्न सुरू करण्यात आले, तर २००६ पासून कासव महाेत्सवाचे आयाेजन करण्यात येत आहे. कासवांच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांना परावृत्त करण्यात आले. यात ग्रामस्थांनी १०० टक्के प्रतिसाद दिला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन