शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जाेर ओसरला; नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 3:39 PM

गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस

रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे इशारा पातळीच्यावर पाेहाेचलेल्या जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळीही कमी झाली आहे. संगमेश्वरातील शास्त्री नदी व राजापुरातील अर्जुना नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आली असून, खेडमधील जगबुडी नदीचे पाणी मात्र अजूनही इशारा पातळीवरच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७२.६७ टक्के (२४४४.७२ मिलीमीटर) पाऊस पडला आहे.हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ दिला असतानाच शुक्रवारपासून पावसाचा जाेर काहीसा कमी झाला आहे. रविवारीही सकाळपासून पावसाने उसंत घेतली हाेती. मुसळधार काेसळणाऱ्या पावसामुळे संगमेश्वरातील शास्त्री नदी, राजापुरातील अर्जुना नदी आणि खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली हाेती. या नद्यांचे पाणी इशारा पातळीच्यावर पाेहाेचले हाेते. त्यामुळे संगमेश्वर, खेड आणि राजापुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली हाेती.मात्र, शुक्रवारपासून पावसाचा जाेर ओसरला असून, सरीवर पाऊस काेसळत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. पावसाचा जाेर ओसरल्याने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

शास्त्री आणि अर्जुना नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली आले आहे. मात्र, जगबुडी नदीचे पाणी अजूनही इशारा पातळीवरच आहे. रविवारी दुपारी १२ वाजता या नदीचे पाणी ५.५० मीटरपर्यंत पाेहाेचले हाेते. नदीचे पाणी ओसरत असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षीपेक्षा जास्त पाऊसजिल्ह्यात १ जूनपासून काेसळलेल्या पावसाने गतवर्षीपेक्षा जास्त सरासरी गाठली आहे. यावर्षी १ जूनपासून २८ जुलैपर्यंत सरासरी २४४४.७२ मिलीमीटर म्हणजेच ७२.६७ टक्के पाऊस पडला आहे. मात्र, गतवर्षी याच कालावधीत सरासरी २०५८.२६ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली हाेती. त्यावेळी ६१.१८ टक्के पाऊस पडला हाेता. यावर्षी आतापर्यंत ११.४९ टक्के जास्त पाऊस पडला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी