शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
3
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
4
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
6
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
7
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
8
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
9
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
10
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
11
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
12
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
13
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
14
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
15
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
16
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
17
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
18
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
19
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश

कौशल्य विकास केंद्रातून स्थानिकांना रोजगारासह अर्थचक्रास चालना मिळणार - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 7:17 PM

कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात या स्वरुपाचे केंद्र माझ्या खात्यातर्फे उभारण्यात येईल तसे दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे गाव असणाऱ्या तासगाव येथेही असेच केंद्र उभारले जाईल.

रत्नागिरी : रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात बांधल्या जाणाऱ्या कौशल्य विकास केंद्रातून  स्थानिकांना रोजगार संधी निर्माण होण्यासोबतच स्थानिक अर्थचक्रास गती मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.या विकास केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन यावेळी सामंत यांच्या हस्ते झाले. जिल्हयात शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने हे केंद्र मदत करेल असे सांगून ते म्हणाले की, कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात या स्वरुपाचे केंद्र माझ्या खात्यातर्फे उभारण्यात येईल तसे दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे गाव असणाऱ्या तासगाव येथेही असेच केंद्र उभारले जाईल.शासकीय तंत्रनिकेतन परिसरात हे केंद्र बांधले जाणार आहे. त्या इमारतीचे काम ९ महिन्यात पूर्ण होईल व नंतरच्या काळात प्रतिवर्षी ५ अभ्यासक्रम असे १५ कौशल्य अभ्यासक्रम येथे सुरु करण्यात येणार आहे. हे राज्यातील पहिलेच केंद्र असून येथे  पुढील ३ वर्षात क्षमतावृध्दी करीत साधारण  ३००० विद्यार्थी प्रतिवर्षी हे कौशल्य प्राप्त करायला सुरुवात होईल.स्थानिक ठिकाणची गरज लक्षात घेऊन येथे पर्यटन,हॉटेल,कृषी आणि अन्न अभियांत्रिकी आदि अभ्यासक्रम सुरु होत आहेत. ज्यातून स्थानिक उद्योगास असणारे मनुष्यबळ आणि रोजगार यांची सांगड घातली जाईल. आगामी काळात रत्नागिरी विमानतळ सुरु झाल्यावर त्या व्यवसायाला कौशल्य अभ्यासक्रमांना देखील यात सामिल करण्यात येणार आहे.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय प्रांगणात हा सोहळा झाला. याला उद्योग जगतामधील व्यक्तींचीही उपस्थिती असावी, असे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला स्थानिक उद्योजक दीपक गद्रे (गद्रे मरीन्स), तरुणकांत दवे (जेएसडब्लूचे  वरिष्ठ उपाध्यक्ष), एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष दिगंबर मगदूम, संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ,  राज्य तंत्रशिक्षण महामंडळाचे डॉ. विनोद मोहितकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. विनोद मोहितकर यांनी तर सूत्रसंचालन पूर्वा पेठे हिने केले .

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत