शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

डाकसेवकांचा संप सुरुच

By admin | Published: March 18, 2015 10:11 PM

शासन उदासीन : विविध मार्गांनी असंतोष व्यक्त

चिपळूण : अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेने १० मार्चपासून पुकारलेला बेमुदत संप गेले ९ दिवस सुरु आहे. विविध प्रलंबित मागण्या या डाकसेवक संघटनेने शासनासमोर ठेवल्या आहेत. परंतु, शासनाने अद्यापही त्यावर विचार न केल्याने नऊ दिवसानंतरही हा संप सुरूच आहे.स्वातंत्र्यपूर्व काळापासून १५० वर्षे सरकारने आपला केवळ वापर करुन घेतला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात दऱ्या-खोऱ्यात राहणाऱ्या जनतेसाठी डाकसेवक हा खऱ्या अर्थाने देवदूत असतो. ऊन, वाऱ्याची तमा न बाळगता तो संदेशवाहकाचे काम प्रामाणिकपणे करतो. स्वातंत्र्यानंतर आजही जेथे दळणवळणाच्या मूलभूत सुविधा नाहीत अशा ठिकाणी डाकसेवक कार्यरत असतो. मात्र, आजपर्यंत कोणत्याही सरकारला त्याची दया येत नाही. याबद्दल संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.संघटनेने ग्रामीण डाकसेवकांसाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तींची कमिटी नेमावी, ग्रामीण डाकसेवकांनाही टपाल खात्यात सामावून घ्यावे, केंद्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवासुविधा द्याव्यात, टपाल खात्याच्या खासगीकरणाचा धातलेला घाट बंद करावा अशा प्रमुख मागण्या आहेत. संपूर्ण देशभर हा संप ७२ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ४५ ते ५० टक्के संप यशस्वी झाला आहे. या संपाला ऊर्जा मिळावी, म्हणून अनेक ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको, धरणे, उपोषणे असे विविध कार्यक्रम सुरु आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामीण डाकसेवकांनी भूलथापांना, अफवांना बळी न पडता केंद्रीय शाखेचा आदेश येईपर्यंत हा संप सुरुच ठेवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य व गोवा प्रांताचे अध्यक्ष व अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव डी. एस. सागवेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी) अन्य शाखांनी कामबंद करावेगेले ८ दिवस संप मिटवण्यासाठी सरकारने पावले उचलली नाहीत. शासनाने लक्ष दिले नाही, तर हा संप चिघळण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात मिळणाऱ्या सर्व सेवा ठप्प होणार आहेत. लाईट बिल, फोन बिल, सेव्हिंग, आरडी, पोस्ट विमा, पत्राचा बटवडा, दहावी, बारावीचे पेपर गठ्ठे आदी कामे बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे. असे असताना जिल्हास्तरीय अधिकारी खोटी माहिती पसरवत आहेत ही खेदाची बाब आहे. जिल्ह्यातील ५० टक्के डाकघर शाखा बंद आहेत. इतर शाखांनीही काम बंद ठेवून संपात सहभागी व्हावे, असे आवाहन सागवेकर यांनी केले आहे.