शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

Ganeshotsav 2024: रत्नागिरीतील मयूर भितळे यांच्या चलचित्र देखाव्यात शेतकऱ्यांच्या व्यथा

By शोभना कांबळे | Published: September 09, 2024 6:18 PM

रत्नागिरी : गणेशोत्सव सामाजिक प्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचा वापर करून रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मयूर सुरेश भितळे या ...

रत्नागिरी : गणेशोत्सव सामाजिक प्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचा वापर करून रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मयूर सुरेश भितळे या तरुणाने शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित चलचित्र देखावा साकारला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा हा देखावा गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच भक्तांना पाहण्यासाठी खुला केला आहे. हा देखावा अनंत चतुर्दशीपर्यंत (१७ सप्टेंबर) पाहता येणार आहे.मयूर भितळे इलेक्ट्रिशियन आहेत. गेली सहा वर्षे ते विविध विषयांवर देखावे सादर करीत आहेत. गोवर्धन पर्वत, शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू यांना पावनखिंडीत ठेवून विशाळगडाकडे केलेली कूच, नारळातील गणपती आदी हुबेहूब देखावे त्यांनी केले आहेत. चलचित्र देखावा त्यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदाच केला होता. अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सकपाळ यांच्या जीवनातील प्रमुख चार कष्टप्रद घटनांवर आधारित चलचित्र देखावा मयूर भितळे यांनी गतवर्षी केला होता. त्यांच्या या देखाव्याची प्रशंसाही झाली होती.या चलचित्र देखाव्यातून प्रेरणा घेऊन यंदा भितळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या देखाव्यातून मांडल्या आहेत. कोकणातील शेती आता अनिश्चित झाली आहे. पाऊस लहरी झाल्याने शेती चांगली होईल, याची शाश्वती नाही, तर काही वेळा त्याच्या जमिनीवरच अतिक्रमण करून बांधकामे उभारली जात आहेत. यातूनच आता शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आली असून, शेतकऱ्यांची मुले आता रोजगारासाठी गाव सोडून शहरात जात आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मयूर भितळे यांनी त्यांच्या या व्यथा या चलचित्र देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.मयूर भितळे यांनी अतिशय अल्प कालावधीत हा देखावा तयार केला आहे. यासाठी त्यांना अनिकेत बाणे, मारुती लोहार, सौरभ मांडवकर, अभिजित आलीम यांचे सहकार्य मिळाले, तसेच रत्नागिरी वाहतूक शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल योगेश सुरेश दोरखंडे यांनी विशेष साहाय्य केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Farmerशेतकरी