शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तब्बल १५ महिन्यांनी तिवरेवासियांच्या पुनर्वसनाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:50 IST

chiplun, tiwre, dam, ratnagirinews चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेनंतर तब्बल १५ महिन्यांनी बाधितांच्या पुनर्वसन वसाहत कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुंबईतील सिध्दिविनायक ट्रस्टने मंजूर केलेल्या एकूण ११ कोटी रुपयांच्या निधीतून प्रथम २४ घरे बांधण्यात येत आहेत.

ठळक मुद्देतब्बल १५ महिन्यांनी तिवरेवासियांच्या पुनर्वसनाला मुहूर्त११ कोटी रुपयांच्या निधीतून प्रथम २४ घरे

चिपळूण : तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेनंतर तब्बल १५ महिन्यांनी बाधितांच्या पुनर्वसन वसाहत कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुंबईतील सिध्दिविनायक ट्रस्टने मंजूर केलेल्या एकूण ११ कोटी रुपयांच्या निधीतून प्रथम २४ घरे बांधण्यात येत आहेत. यासाठी काढलेल्या घर बांधणीच्या दोन्ही निविदांची कामे राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांच्या कंपनीला मिळाली आहेत. सद्यस्थितीत अलोरे येथे बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली जागा साफसफाईला सुरुवात झाली आहे.गतवर्षी २ जुलैच्या रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर उडालेल्या हाहाकारात अपरिमित आर्थिक व जीवितहानी झाली. तब्बल २२ जणांचे बळी गेले आणि ४५ कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी झाली. या कुटुंबियांना आर्थिक स्वरूपाची मदत झाली असून, काही महिन्यांपूर्वी येथील वाहून गेलेली जॅकवेल पुन्हा उभारून पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे.त्यानंतर आता पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे. पुनर्वसन, रस्ते, पूल, साकवांसह धरण पुनर्बांधणी याची कार्यवाही सुरु केली आहे. यामध्ये मुख्यत: बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत.प्रथमत: एक मॉडेल घर तयार करण्यात येणार आहे. तपासणीनंतर उर्वरित घरांच्या कामांना सुरुवात होणार आहे. अलोरे येथे कोयना प्रकल्पाची वसाहत पडून असल्याने तेथे १.६० हेक्टर जागेवर पुनर्वसन करण्यात येत आहे. पाणी, वीज, बाजारपेठ, शाळांसह सर्व सोयी सुविधांनी युक्त ही जागा महत्वाची आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ३ कोटी ८० लाख रुपये खर्चाच्या २४ घरांसाठीच्या २ निविदा काढल्या होत्या. या दोन्ही निविदांची कामे राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली आहेत. तूर्तास २४ घरांचा प्रश्न सुटला आहे. एकूण ४० कुटुंबाचे पुनर्वसन होणार असल्याने व त्यातच काहीजणांना गावातच राहायचे असल्याने त्यांच्या जागेचा शोध सुरू आहे.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण