शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न

By अरुण आडिवरेकर | Published: August 25, 2022 5:20 PM

महामार्गाचे अपूर्ण काम आणि खड्ड्यांमुळे गावी येताना जीव मुठीत घेऊनच यावे लागणार

अरुण आडिवरेकररत्नागिरी : गेली दाेन वर्ष काेराेनाच्या भीतीमुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांच्या मनात भीती हाेती. अनेकजण जीव मुठीत घेऊनच गावी आले हाेते. यावर्षी काेराेनाचे प्रमाण कमी, त्यातच काेणतेही निर्बंध नसल्याने मुंबईकर माेठ्या प्रमाणात गावी येणार आहेत. मात्र, महामार्गाचे अपूर्ण काम आणि खड्ड्यांमुळे गावी येताना जीव मुठीत घेऊनच यावे लागणार आहे.यावर्षी काेराेनाची रुग्णसंख्या कमी आहे. त्यातच शासनाने उत्सवावरील निर्बंध उठविल्याने गणेशाेत्सव दणक्यात साजरा हाेणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मुंबईकर माेठ्या प्रमाणात गावी येणार आहेत. मात्र, गावी येताना मुंबईकरांना महामार्गावरील खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. वेळेत घरी पाेहाेचण्यासाठी लवकरच निघावे लागणार आहे.

कशेडी घाटातील भुयारी बाेगद्याचे काम अर्धवट स्थितीतजिल्ह्याची सीमा सुरु हाेणाऱ्या कशेडी घाटातील भुयारी बाेगद्याचे काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे. दाेनपैकी एकच बाेगदा पूर्ण खाेदून झाला आहे. मात्र, अंतर्गत काम अजूनही झालेली नाही. या भागात खड्डे पडल्याने जिल्ह्याच्या हद्दीतच खड्ड्यांनी स्वागत हाेणार आहे. तालुक्यात ४४ किलाेमीटरच्या भागात ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, असगणी फाटा येथील ओव्हर ब्रीजचे काम अर्धवट आहे.

परशुराम घाटात काम रखडलेलेचिपळूण तालुक्यात कापसाळ, कामथे, वालाेपे, परशुराम घाट आणि सावर्डे या भागात खड्ड्यांमुळे जीव मेटाकुटीला येताे. शहरातील पाॅवर हाऊस, बहाद्दूरशेख नाका, परशीतिठा हा भागही खड्डेमय झाला आहे. कामथे, परशुराम घाटात काम रखडलेले आहे. शहरातील उड्डाणपुलाच्या ४५ पैकी केवळ १३ पिलरचे काम झाले आहे. उर्वरीत काम अर्धवटच आहे. दाेन किलाेमीटरचा सर्व्हीस राेडही खड्डेमय आहे.

संगमेश्वर तालुक्यातील तीन पुलांची कामे रखडलेलीसंगमेश्वर तालुक्यातील धामणी, तुरळ, कुरधुंडा, वांद्री, आरवली या भागात खड्डेच खड्डे आहेत. या मार्गावरील माेऱ्यांवर डांबरीकरण न झाल्याने वाहन चालविणे मुश्किल झाले आहे. साेनवी पुलाचे तीन पिलर अर्धवट स्थितीत आहेत. शास्त्रीनदीवरील पुलाचा जाेडरस्ता झालेला नाही तर मानसकाेंड येथील पूल रखडलेलाच आहे.

राजापूर तालुक्यात मात्र, बहुतांशी काम पूर्णलांजा तालुक्यातील देवधेपासून वाकेडपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना सांभाळूनच यावे लागणार आहे. शहरात नळपाणी याेजनेमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. राजापूर तालुक्यात मात्र, बहुतांशी काम पूर्ण झाले असून, एसटी बस स्थानक, काेदवलीत ५०० मीटर आणि हातिवलेतील ५०० मीटरचा भाग वगळता काॅंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागातील प्रवासात खड्ड्यांचा त्रास कमी हाेणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सवroad transportरस्ते वाहतूक