शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
5
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
6
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
7
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
8
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
9
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
10
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
11
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
12
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
13
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
16
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
17
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
18
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
19
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
20
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?

शाळा बंद विरोधात रत्नागिरीत धरणे आंदोलन

By अरुण आडिवरेकर | Published: October 20, 2022 6:33 PM

कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यास येथील दुर्गम भागातील अनेक शाळा बंद होतील.

रत्नागिरी : शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एक जरी विद्यार्थी शाळेत शिकत असेल तरी ती शाळा बंद करू नये, या मागणीसाठी गाव विकास समितीने आज, गुरुवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. गाव समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुर्गम भागात शाळा आहेत. यातील अनेक शाळांचा पट हा ० ते २० च्या मध्ये आहे. कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यास येथील दुर्गम भागातील अनेक शाळा बंद होतील. त्यामुळे गाव खेड्यातील, दुर्गम भागातील सामान्य विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल, असे गाव विकास समितीने जिल्हाधिकारी यांना आंदोलनादरम्यान दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कमी पटसंख्या असली तरी दुर्गम भागातील शाळा बंद होऊ नयेत अशी आमची भूमिका असून, हीच भूमिका येथील विद्यार्थी व पालकांची आहे, असे गाव विकास समितीने म्हटले आहे.यावेळी सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे, जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर, जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी, रत्नागिरी जिल्हा संघटक मनोज घुग, तालुका संघटक सुकांत पाडाळकर, संगमेश्वर तालुका संघटक प्रशांत घुग, ग्रामीण विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष दैवत पवार, सदस्य नितीन गोताड, महेंद्र घुग, शुभम गोरुले उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळा