शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
3
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
4
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
5
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
6
Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ
7
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
8
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
9
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
10
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
11
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
12
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
13
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
14
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
15
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
16
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
17
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
18
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
19
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
20
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी

दोन वेळा कंत्राटदार बदलूनही मुंबई-गोवा महामार्ग रखडला; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 7:44 AM

तीन प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे झाला.

पनवेल / अलिबाग / रत्नागिरी: मुंबई-गोवामहामार्गाच्या रुंदीकरणाबाबत दोन कंत्राटदार बदलावे लागले. सन २०११ मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच दिलेल्या  संबंधित कंत्राटदारांना या कामातील दिरंगाईसाठी जबाबदार धरले. आठ वर्षांच्या कार्यकाळात अधिकारी बदलले, कंत्राटदार बदलले, त्यामुळे मुंबई-गोवामहामार्ग रखडला, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच आता मी या खात्यावर कायम असल्याने येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

तीन प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे झाला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या रखडलेल्या मार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मी स्वतः कंत्राटदार जे. एम. म्हात्रे यांच्या मागे लागलो, त्यानंतर त्यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले. पळस्पे ते इंदापूर महामार्गही डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असे गडकरींनी सांगितले.  यावेळी गडकरी यांनी १३ हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल आणि मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ १२ तासांपर्यंत कमी करेल.  

कार्यक्रमाप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठठाकूर,जे. एम. म्हात्रे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता एस शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसीलदार विजय तळेकर, पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे आदी उपस्थित होते.

महामार्गावर टोल नकोच आजवर या मार्गावर हजारोंना जीव गमवावा लागला. या मृतांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहायची असेल तर या मार्गावर टोल नाके नको, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केली.

उपग्रहावर आधारित टोल वसुलीमहामार्गांवर उपग्रह-आधारित भाडे संकलन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे. यामुळे टोल भरण्यासाठी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत, अशी  माहिती गडकरी यांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवाRatnagiriरत्नागिरी