शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

पावसाळ्यानंतर महायुतीही उतरणार मैदानात - सुनील तटकरे 

By मनोज मुळ्ये | Published: July 29, 2023 3:24 PM

रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एखादा प्रकल्प राज्याच्या, देशाच्या हिताचा असतो, तेव्हा त्यात राजकारण आणता येत कामा नये

रत्नागिरी : प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचा उत्तर भारतीयांचा मेळावा घेत आहेत, ही बाब त्यांच्या पक्षाशी संबंधित आहे. महायुती म्हणून राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना पावसाळ्यानंतर सभा, बैठका सुरू करेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी दिली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी रत्नागिरीत आलेल्या सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमंशी संवाद साधला. ठाकरे शिवसेना उत्तर भारतीयांचा मेळावा घेणार आहे. त्याविषयी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे महाअधिवेशन घेतले होते. यात पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या दीर्घ भाषणात पक्षाची ध्येयधोरणे मांडली आहेत. त्यानुसारच पक्षाची भूमिका असेल ते म्हणाले. राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार का, असा प्रश्न करण्यात आला असता ते म्हणाले की, काही काळ थांबावे लागेल. काळाच्या ओघात त्याची उत्तरे मिळतील.महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला काम करता आले नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. याबाबतच्या प्रश्नावर तटकरे म्हणाले की, अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादांचे योगदान खूप मोठे आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत ते मंत्रालयात काम करत असत. पण त्यांच्या क्षमतेचा उपयोग करुन घेतला गेला नाही.रिफायनरी प्रकल्पाबाबत राजकीय पक्षांच्या भूमिका सतत बदलत आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एखादा प्रकल्प राज्याच्या, देशाच्या हिताचा असतो, तेव्हा त्यात राजकारण आणता येत कामा नये. जी गोष्ट लोकांच्या हिताची आहे, त्यात पक्षाची भूमिका महत्त्वाची असता नये. एखाद्या प्रकल्पाची गरज, त्याचे फायदे, रोजगाराची उपलब्धता त्याबाबतची सर्व माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची आहे. प्रकल्पाशी निगडीत चांगल्या वाईट गोष्टी लोकांना समजावून सांगायला हव्यात. लोकांचे शंकानिरसन करायला हवे. मात्र रिफायनरीबाबत तसे झाले नाही.

संभाजी भिडेंवर कारवाई व्हावीमहात्मा गांधी यांच्याबद्दल केवळ देशातच नाही तर जगात आदर व्यक्त केला जातो. त्यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी केलेले विधान अत्यंत चुकीचे आहे. राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला हवी, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी मांडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsunil tatkareसुनील तटकरे