शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

Ratnagiri: नवीन मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्प ४० वर्षे रखडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 19:10 IST

हर्षल शिरोडकर खेड : तालुक्यातील किंजळेतर्फ नातू, पुरे, तळे, कुडोशी व सुकिवली या पाच गावातील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रस्तावित ...

हर्षल शिरोडकरखेड : तालुक्यातील किंजळेतर्फ नातू, पुरे, तळे, कुडोशी व सुकिवली या पाच गावातील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रस्तावित असलेला नवीन मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्प तब्बल ४० वर्षे रखडला आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. धरणाच्या रखडलेल्या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास या परिसरातील पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.

सन १९८३ साली या धरणाला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली. मूळ धरण हे ४४५ मीटर व उंची ४९.४५ मीटर आहे. तर ओगी पद्धतीचा ९४ मीटरचा सांडवा प्रस्तावित आहे. २०.४३३ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाच्या निर्मितीमुळे पाच गावातील १८७७ हेक्टर जमीन पीक क्षेत्राखाली येणार आहे. धरणाला असणारा उजवा कालवा २१ कि. मी.चा असून, १ ते १० कि. मी.चा खुला कालवा आहे. त्यातील बहुतांशी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर ११ ते २१ मधील कामे पीडीएन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत.या धरणासाठी एकूण ११३.४० हेक्टर क्षेत्राची भूसंपादन कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी २९५.३४ लाख मोबदल्याचे वाटपही पूर्ण करण्यात आले आहे. या धरण क्षेत्रामुळे बाधित झालेल्या ८४ कुटुंबांना मौजे तळे आणि मांडवे येथे प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. पुनर्वसन ठिकाणी प्रकल्प बाधितांना देण्यात येणाऱ्या १८ नागरी सुविधांपैकी बऱ्याच सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धरण पूर्णत्वाच्या मार्गातील अनेक अडथळे आता दूर झाले आहेत.धरणाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर

सध्या धरणातील घळभरणीचे काम पूर्ण करण्याचे मुख्य धोरण असून, सांडवा बार तसेच गाईड वॉल कालव्याचे (पीडीएन) काम पूर्ण करणे आवश्यक आहे. घळभरणीचे मुख्य काम पूर्ण झाल्यास धरणामध्ये पाणी साठवण सुरू होण्याची शक्यता आहे.वीज प्रकल्प प्रस्तावित

या धरणावर २ मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. त्या पद्धतीने धरणाची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे होणारी वीजनिर्मिती ही नजीकच्या गावांना मिळाल्यास गावातील भारनियमनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. यासाठी करार केला जाणाऱ्या कंपनी आणि महावितरण विभाग यांनी तसा प्रस्ताव संबंधित गावच्या ग्रामपंचायतीकडे देण्याची गरज आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी