शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे नव्याने सर्वेक्षण : उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: July 22, 2023 18:23 IST

इर्शाळवाडीमध्ये डोंगरच अख्खा सरकला, आता याच दृष्टीकोनातून नव्याने सर्वेक्षण 

रत्नागिरी : दरड कोसळण्याचा आतापर्यंतचा अनुभव म्हणजे डोंगरावरील दगड माती मोठ्या प्रमाणात खाली येते. पण रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये आलेला अनुभव खूपच वेगळा होता. तेथे डोंगरच अख्खा सरकला आहे. त्यामुळे आता याच दृष्टीकोनातून जिल्ह्यातील दरडग्रस्त ठिकाणांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. आठ ते दहा दिवसात त्याचा अहवाल मिळेल, असेही ते म्हणाले.पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेनंतर मंत्री उदय सामंत तेथे मध्यरात्रीच पोहोचले होते. तेथील मदत कार्याला दिशा देतानाच त्यांनी सर्व प्रकार जवळून पाहिला. त्याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, आतापर्यंत जेथे कोठे दरड कोसळली, तेथे डोंगरावरील माती, दगड, झाडेझुडपे खाली आले. पण इर्शाळवाडीमध्ये डोंगरच पुढे आला आहे. अपघातग्रस्त वस्ती १५० वर्षांपूर्वीची आहे. असे आतापर्यंत कोकणात कधी झाले नव्हते. असा प्रकार इतरत्रही होऊ शकतो. त्यासाठीच आता नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त भागांचे सर्वेक्षण झाले आहे. तेथे आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. लोकांना स्थरलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण हे सर्व आतापर्यंतच्या अनुभवावर आधारित आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे नवाच प्रकार समोर आला आहे. अशा पद्धतीने डोंगरच हलला तर तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळेच आपण जिल्हाधिकारी यांना नव्याने सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलनRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणUday Samantउदय सामंत