शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

आता ‘मँगानेट’चा पर्याय

By admin | Published: November 23, 2014 12:42 AM

आंबा निर्यात : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कार्यक्रम

रत्नागिरी : युरोपीय देशांनी गतवर्षी आंब्याला आंबा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडास सामोरे जावे लागले. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना आंबा निर्यातीमध्ये कोणतीही समस्या येऊ नये याकरिता कोकणातील पाच जिल्ह्यात ‘मँगोनेट’ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.कोकणातील आंब्याला परदेशामध्ये प्रचंड मागणी आहे. परंतु गतवर्षी युरोपीय देशांनी फळमाशीचे कारण देत आंबा व भाजीपाला आयात करण्यास नकार दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या संदर्भामध्ये शासनाने निर्यातीस प्रोत्साहन देण्याकरिता मँगोनेट व व्हेज नेट प्रणाली विकसीत केली आहे.राष्ट्रीय कृ षी विकास योजनेंतर्गत २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षासाठी मँगो नेट योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ५० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. मँगो नेटसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघरसह अन्य १३ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंबा बागायतदारांची नोंदणी करुन घेण्यात येणार असून मँगो नेटसाठी १० डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातर्फे ही नोंदणी सुरु केली जाणार आहे. त्यामध्ये निर्यातक्षम बागांची नोंदणी करणे, निर्यात वाढविण्यासाठी किडरोग व किडनाशक अंशमुक्त शेतीमालाची हमी मिळावी यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. परदेशात आंबा पाठविण्यासाठी आवश्यक फायटो सॅनेटरी प्रमाणपत्र जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून देण्याची जबाबदारी असून त्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कोकणातील पाच जिल्ह्यात मँगो नेटची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने बागायतदारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या साऱ्यात शेतकऱ्यांनीही जागृक राहून कृषी विभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)४युरोपीय देशांनी गतवर्षी आंबा निर्यात बंदी घातली होती ४कोकणातील पाच जिल्ह्यात मँगो नेटची अंमलबजावणी ४गतवर्षी देण्यात आले होते फळमाशीचे कारण ४प्रोत्साहन देण्यासाठी मँगो नेट व व्हेज नेट प्रणाली विकसित ४राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणार मँगो नेट ४रत्नागिरी , सिंधुदूर्ग, रायगडसह अन्य १३ जिल्ह्यात