शहरं
Join us  
Trending Stories
1
Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
2
Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     
3
निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
4
आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...
5
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी 
6
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे
7
Kojagiri Purnima 2024: कोजागरीला गजपूजाविधी व्रत केल्याने होते ऐश्वर्यप्राप्ती; जाणून घ्या विधी!
8
Waaree Energies IPO: ३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या
9
चीन आणि तैवानमध्ये संघर्ष वाढला; १५३ फायटर जेट विमानं तैनात, युद्धासाठी आव्हान
10
Vastu Shastra: श्रीमंतांच्या घरात हमखास सापडतील 'या' सात वस्तू; धनवृद्धीसाठी आजच आणा!
11
मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले
12
Aadhaar Card मधील मोबाइल नंबर ऑनलाइन बदलता येतो का? काय आहे नंबर बदलण्याची प्रक्रिया
13
कौतुकास्पद! सहावीत नापास झाली, पण हार नाही मानली; कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात IAS
14
अपंगत्वाच्या आधारावर MBBS मध्ये प्रवेश रोखता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका
16
सावधान! गर्लफ्रेंडची कॉल हिस्ट्री, चॅट्स पाहताय? बॉयफ्रेंडची अशी होतेय फसवणूक...
17
अश्विनबद्दल हे काय बोलून गेला पाकिस्तानचा रमीझ राजा... Video पाहून भारतीयांना नक्कीच येईल राग
18
आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 
19
बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार, कोअर कमिटीत निर्णय
20
डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी

Raj Thackeray : आता उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणं राज्याला परवडणारं नाही : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 8:44 PM

राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्ग, बारसू रिफायनसी, राज्यातील राजकीय वातावरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

शनिवारी रत्नागिरीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्ग, बारसू रिफायनसी, राज्यातील राजकीय वातावरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आता उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणं हे महाराष्ट्राला परवडणारं नसल्याचं म्हटलं.

“महाराष्ट्रातील तरूणांना तरुणींना त्यांच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी या गोष्टी परवडणाऱ्या नाहीत. मूळात पहिल्यांदा जमिनी द्यायच्या नव्हत्या. पण आज ज्या गोष्टी करून ठेवल्यात त्यामुळे महाराष्ट्र विचित्र परिस्थितीत सापडलाय. उद्या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अशी होईल की सरकारमध्ये पगार देणं शक्य होणार नाही. तेव्हा सरकार कोणाचंही असेल ते पडेल,” असं राज ठाकरे म्हणाले.  युनेस्कोनं जगभरातल्या १९२ देशांसोबत करार आहेत. त्यात भारतही आहे. युनेस्कोच्या अंतर्गत येणाऱ्या गोष्टी आहेत त्यानंतर ती संस्था ठरवते त्याच्या बाजूला डेव्हलपमेंट होणार की नाही होणार. हजारो वर्ष जुन्या वास्तूंच्या बाजूला डेव्हलपमेंट करता येत नाही. आमच्याकडे जमिनी विकल्या, युनेस्को काय आहे हे माहितच नाही. उद्या त्यांनी सांगितलं की सरकारला करावंच लागेल. कातळ शिल्पांच्या बाजूला किलोमीटरचा बफर एरिया असतो, त्या ठिकाणी काही करता येत नाही, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.

“तुम्हाला सतत अंधारात ठेवलं जातं. तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचू देत नाही, तुमच्या जमिनी हडपल्या जातात. जमिन घ्यायला कोणी आलं तर त्याला कशासाठी आलायस विचारा. जमिनी तुमची ठेवा, तिच जमिन तुम्हाला पैसे देईल. या निवडून आलेल्यांना घरी बसवा. तुमचा राग व्यक्त होऊ दे,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

अनेक प्रश्न प्रलंबित

आज कोकणात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते उभे राहण्याची कारणं तुम्ही आहात. तुम्ही त्याच त्याच व्यापारी लोकप्रतिनिधींना निवडून देऊन, पक्षाला निवडून दिलं, त्यांनी कोकणाचा व्यापार केला. तुम्ही तिकडेच आहात, असं ते यावेळी म्हणाले. २००७ ला सुरू झालेला मुंबई गोवा रस्ता अजूनही काही नाही. मधले पॅचेस झालेत. मी मागेही फडणवीसांना फोन केला. मला त्यांनी गडकरींशी बोलायला सांगितलं. त्यांना मी फोन केला. तेव्हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टर पळून गेल्याचं सांगितलं. ज्यांना आजवर निवडून दिलं त्यांनी आजवर यावर काही विचारलं का? या लोकांना मतदानाशी संबंधित विषय आहे फक्त. तोच समृद्धी महामार्ग पाहा. सुरू पण झाला आणि तेही चार वर्षात. नागपूर ते शिर्डी आणि पुढचं काम सुरू आहे, आता गाड्या फिरतायत. १६ वर्ष आमचा रस्ता पूर्ण होत नसल्याचं खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरी