शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
3
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
4
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
5
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
6
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
7
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
8
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
9
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
10
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
11
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
12
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
14
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
15
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
16
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
17
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
18
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
19
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
20
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू

रोपवाटिका व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

भातशेतीमध्ये लागवडीसंबंधी प्रामुख्याने दोन भाग पडतात. त्यातील पहिला म्हणजे रोपवाटिकेत रोपे तयार करून त्याची पुनर्लागण करणे आणि दुसरा पेरभात ...

भातशेतीमध्ये लागवडीसंबंधी प्रामुख्याने दोन भाग पडतात. त्यातील पहिला म्हणजे रोपवाटिकेत रोपे तयार करून त्याची पुनर्लागण करणे आणि दुसरा पेरभात लागवड होय. अति पावसाच्या भागात पहिल्या, तर कमी पर्जन्यमानाच्या विभागात दुसऱ्या पध्दतीचा अवलंब केला जातो. पुनर्लागण पध्दतीत प्रतिहेक्टरी रोपांची संख्या योग्य राखल्याने तसेच पिकाची जाेमदार वाढ झाल्याने उत्पन्न जास्त मिळते. त्यामुळे बहुतांश शेतकरी भाताची लागवड पुनर्लागण पध्दतीने करतात. त्यासाठी रोपवाटिकेत रोपे तयार करण्याची आवश्यकता असते. स्थानिक परिस्थिती, हवामानातील घटक, पावसाचा लहरीपणा, आर्थिक बाब इत्यादी गोष्टी विचारात घेऊन रोपे तयार करण्याच्या वेगवेगळ्या पध्दतींचा अवलंब केला जातो.

कोकणामध्ये भाताची लागवड मुख्यत: खरीप हंगामात केली जाते. त्यामध्ये हळव्या, निमगरव्या तसेच पाणथळ ठिकाणी गरव्या जातीची लागवड केली जाते. भाताची लागवड रोपे तयार करून केली जाते. भाताची निरोगी व सुदृढ रोपे ही पिकाच्या अधिक उत्पादनाची गुरूकिल्ली आहे. एकूण भात उत्पादनाचा पाया असलेल्या भात रोपवाटिकेचे व्यवस्थापन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करूनच केले पाहिजे. भाताच्या चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या रोपांची आवश्यकता असते. त्यासाठी रोपवाटिकेपासून व्यवस्थापन केल्यास निरोगी रोपांची उपलब्धता होते. यासाठी गादी वाफा व रहू पध्दतीने रोपनिर्मिती करता येते.

जागेची निवड व पूर्वतयारी

भात रोपवाटिका तयार करण्यासाठी जमिनीचा उतार लक्षात घेऊन उंच ठिकाणी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. अगोदरच्या पिकाची कापणी होताच शेताची नांगरणी करावी आणि शेत उन्हाळ्यात तापू द्यावे. सुरुवातीचा पाऊस पडल्यानंतर पुन्हा रोपवाटिकेचे क्षेत्र दोन वेळा उभे आडवे नांगरून ढेकळे फोडून भुसफुशीत करावे. उगवलेल्या तणांचा नायनाट करावा. प्रतिगुंठा क्षेत्रास अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळून घ्यावे. त्याचबरोबर तुसाची राख मिसळावी.

निरोगी रोपे

भात रोपवाटिकेत वाढणारी रोपे तुसाच्या राखेतील सिलीकाॅन आणि पालाश यांचे शोषण करून घेऊन ती कणखर व निरोगी बनून त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशी रोपे शोषण करून घेऊन ती कणखर व निरोगी बनून त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ही रोपे लावणीसाठी वापरल्यास भरपूर मुळे फुटतात.

रोपवाटिकेचे प्रकार

भाताच्या रोपवाटिकेसाठी गादीवाफा, सपाट वाफा, ओटे करून, रहू पध्दतीने, दापोग तसेच चटई पध्दतीने (मॅट) रोपांची निर्मिती करून पुनर्लागण करू शकतो. परंतु कोकणामध्ये अति पर्जन्यमानाच्या ठिकाणी गादी वाफा पध्दत अति फायदेशीर आहे. शेतकरी फायदेशीर पध्दतीची निवड रोपवाटिकेसाठी करीत आहेत.