शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
2
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
3
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
4
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
5
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
6
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
7
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
8
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
9
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
10
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
11
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
12
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
13
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
14
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
15
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
16
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
17
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
18
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
19
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
20
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!

पावसाळ्याआधी महामार्गाची एक बाजू पूर्ण करणार : मंत्री चव्हाण

By मनोज मुळ्ये | Published: April 15, 2023 6:31 PM

आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी मंत्री चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कोकण दौऱ्यानंतर कामाला अधिक गती आली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची एक बाजू पूर्ण करण्याचा आणि डिसेंबर २०२३ पर्यंत दुसरी बाजू पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी मंत्री चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पक्षाला बळकटी यावी, बूथ समित्या अधिक सक्षम व्हाव्यात, केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेले निर्णय, वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत जाव्यात, यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगला समन्वय आहे आणि भविष्यात तो अजून चांगला होईल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्राचे अनेक प्रकल्प मागे पडले होते. राज्य सरकारने त्यासाठी आपला हिस्सा न दिल्यामुळे काही चांगल्या योजना राबवल्या गेल्या नाहीत. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे, असे ते म्हणाले.

दिवाळीत आनंदाचा शिधा योजनेचा लाभ ९८ टक्के लोकांनी घेतला होता. आता गुढीपाडवा ते आंबेडकर जयंती या काळात ७० ते ७५ टक्के लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि अजूनही त्याचा कालावधी बाकी असल्याने या काळात अधिकाधिक लोक त्याचा लाभ घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बांधकामसह अनेक खात्यांत अनेक पदे रिक्त आहेत. त्यांची दखल घेतली असून, टप्प्याटप्प्याने भरती केली जात असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :highwayमहामार्ग