शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मालघरमध्ये पोस्टला जागा देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST

चिपळूण : केंद्र सरकारचे पोस्ट ऑफिस ही समाजसेवी संस्था नाही. ती वित्तीय व्यावसायिक संस्था आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे पोस्टासाठी मोफत ...

चिपळूण : केंद्र सरकारचे पोस्ट ऑफिस ही समाजसेवी संस्था नाही. ती वित्तीय व्यावसायिक संस्था आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे पोस्टासाठी मोफत जागा आणि सेवा सुविधा मागणे चुकीचे आहे. मुळात अनेक गावांत ग्रामपंचायतींना स्वतःची जागा नाही. अशातच लहान गावांना पोस्टाला सेवा सुविधा देण्याचा भार पेलवणारा नाही. त्यामुळेच बहुतांशी ग्रामपंचायती पोस्टाला मोफत जागा देत नसल्याचे मत मालघरचे माजी सरपंच राजेश वाजे यांनी पत्रकारांना सांगितले.

भारतीय डाक घर ही केंद्र सरकारची अंगीकृत असलेली वित्तीय संस्था आहे. गावोगावी या डाकघराचे जाळे पसरले आहे. पोस्टाला बँकिंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. २०१५ मध्ये केंद्र सरकारने परिपत्रक काढून ग्रामपंचायतींना पोस्टासाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. त्यानुसार, पोस्टाचे रत्नागिरी अधीक्षकांनी ग्रामपंचायतींना पत्र देत मोफत कार्यालयासाठी जागा देण्याची विनंती केली होती. यावर तालुक्यातील अनेक सरपंचांनी असमर्थता दर्शविली.

मालघरमध्ये ग्रामपंचायतीची स्थापना १९९५ ला झाली. त्यापूर्वीच १९६० पासून गावात पोस्ट ऑफिस सुरू आहे. आमच्यासह काहींनी त्या-त्यावेळी घरात पोस्टासाठी जागा दिली होती. आता येथील कर्मचाऱ्याला बढती मिळाल्याने पोस्ट बंद आहे. गावातील अनेक लोकांनी पोस्टात लाखोंची गुंतवणूक केली आहे. त्यांना आता व्यवहारासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. मुळात पोस्ट ऑफिस ठेवी घेऊन कर्ज देते, त्यावर व्याज घेते. ती सामाजिक सेवाभावी संस्था नाही. त्यांनी भाड्याने जागा, इमारत घेतली, तर काहीही फरक पडणार नाही. पोस्टाला इंटरनेट, वीज, पुरवायची, ही सेवा ग्रामपंचायतीला मोफत मिळत नाही. अनेक ग्रामपंचायतींना स्वतःचा कारभार चालविण्यासाठी इमारतीची जागा पुरत नाही. ग्रामसभा सार्वजनिक ठिकाणी घ्यावी लागते. गावात कोणाला मोफत घरातील एक खोली द्या म्हटले, तर ती मिळत नाही. पुन्हा पोस्टात आर्थिक विषय असल्याने, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित होतो. यामुळेच ग्रामपंचायतींना पोस्टासाठी जागा उपलब्ध करून देणे तूर्तास अशक्य असल्याचे राजेश वाजे यांनी सांगितले.