शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

कांदाटी खोऱ्यात गवारेड्याकडून भात उद्ध्वस्त, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 5:40 PM

शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ

खेड : प्रशासकीय दृष्टीने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात असणाऱ्या, मात्र भौगोलिकदृष्ट्या केवळ खेड तालुक्याला संलग्न असलेल्या कांदाटी खोऱ्यातल्या शिंदी, वळवण, उचाट या गावांमध्ये गवारेड्याने भातलावणीसाठी रुजवात केलेला भाताचा रूजून आलेला तरवा (छोटी भात रोपे) खाऊन टाकल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.खेड ते खोपी मार्गाचे रघुवीर घाट फोडून विस्तारीकरण करण्यात आल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरे रत्नागिरी जिल्ह्याशी जोडले गेले आहे. पावसावर अवलंबून असलेले आणि वर्षातून एकदाच घेतले जाणाऱ्या भात पिकावर आलेल्या गवारेड्यांच्या संकटामुळे खोऱ्यातले शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले असून, वन विभागाकडून साधे पंचनामेही झाले नाहीत. आता वर्षभर काय खायचे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा आहे. वन विभागाकडून नुकसानभरपाई नाही मिळाली तर आत्महत्या करण्याचा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.कोयना धरण बांधल्यानंतर अनेक गावे पुनर्वसित झाली तर काही गावकरी त्याचठिकाणी राहिले. सद्य:स्थितीत या गावातील अनेकजण नोकरीधंद्यासाठी मुंबई - पुण्याला गेले. येथे राहणारे ग्रामस्थ पारंपरिक भातशेतीवर अवलंबून आहेत. यावर्षीही त्यांनी पारंपरिक पद्धतीने पावसाळ्यात भात पेरणी केली. मात्र, पेरणी करून उगवलेल्या भाताचे तरवे कोयना अभयारण्यात असलेल्या गवा रेड्यांनी खाऊन उद्ध्वस्त केले आहेत. वर्षभर ज्या भातशेतीवर अवलंबून राहावे लागते तीच भातशेती गवारेड्याने उद्ध्वस्त केल्याने आता वर्षभर खायचे काय, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.महाबळेश्वर तालुक्याच्या वन विभाग कार्यालयाकडे वारंवार सांगूनही शेताची पाहणी आणि पंचनामाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला नाही. वर्षभर पोटाची भूक भागवणारे भात पीक पूर्णच नष्ट झाल्याने शेताच्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कोयना धरणानंतर आता या कांदाटी खोऱ्यात वास्तव्याला असणाऱ्या गावांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झाली आहे. अत्यंत दुर्गम आणि जंगलमय भागात राहात असलेले हे लोक शासनाकडून मोठी अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र, पारंपरिक शेती करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्यांना आवश्यक गोष्टींची पूर्तता व नुकसानभरपाई तरी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग