शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कांदळवन क्षेत्र नोंदीचा अहवाल सादर

By admin | Published: March 18, 2015 10:21 PM

गुहागर तालुका : लवकरच होणार सातबारा उताऱ्यावर नोंद

गुहागर : गुहागर तालुक्यात १४ गावांमधील १४८ हेक्टर कांदळवन क्षेत्र संरक्षित असून याची शासकीय सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी अधिसूचनेसाठीचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.याबाबत प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी गुहागरमधील कांदळवन क्षेत्राच्या भूमी अभिलेख खात्याच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यामध्ये सातबाऱ्यावरील प्रत्यक्ष क्षेत्र व त्यामधील कांदळवन क्षेत्र त्याची दिशा अशा अनेक बाबींबाबत राहिलेल्या त्रूटी दूर करण्याचे काम गेली अनेक दिवस चालू होते.महसूल खात्याकडून अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम अधिसूचनेसाठी पाठवण्यात आला आहे. यामध्ये शासनाच्या ताब्यात असलेल्या हद्दीमधील १४८ हेक्टर क्षेत्र प्रत्र्यक्ष सातबाऱ्यावरती नोंद करुन वनखात्याच्या ताब्यात दिले जाणार आहे. यापूर्वी राहिलेल्या त्रुटी दूर करुन या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलेल्या कांदळवन क्षेत्राचे सातबाऱ्यावरती नोंद करुन वनविभागाकडे याचा ताबा देण्यासाठीची ही प्रक्रिया असून यावरती गेली वर्षभर काम सुरु आहे. महाराष्ट्र रिमोंट सेन्सीज अ‍ॅप्लीकेशन सेंटर नागपूर यांच्याकडून सॅटेलाईटद्वारे घेतलेला नकाशा व एरीया स्टेटमेंट भूमी अभिलेख खात्याकडे देण्यात आले होते. घरटवाडी, तवसाळ व अन्य काही गावांचे कांदळवन क्षेत्र तब्बल काही शेकड्यांनी चूकभुलीने वाढवल्याने गुहागर तालुक्यात १७०० हेक्टर कांदळवन क्षेत्राची चुकीची नोंद करण्यात आली होती. यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर याबाबत कमी जास्त पत्रके करुन या क्षेत्राला नवीन सर्व्हे नंबर व गट नंबर देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितले की, १४ गावांमधील आतील १४८ हेक्टर क्षेत्र आहे. याबाबत सध्या कार्यवाही चालू आहे. तसेच शासनाच्या ताब्यात नसलेली बाहेरील १९ गावांमधील १०३ हेक्टर कांदळवन क्षेत्र आहे. याबाबत अद्याप कोणतेही शासाकडून निर्देश आलेले नाहीत. भविष्यात हे क्षेत्रही शासन ताब्यात घेईल अशी शक्यता आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून अंतिम अधिसूचना जाहीर झाल्यानंतर काही हरकती असल्यास त्या स्वीकारुन त्यावर विचार होणार आहे. (प्रतिनिधी)समुद्राचे अतिक्रमण थोपवण्याबरोबरच माशांना प्रजननासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून कांदळवन क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. किनाऱ्याजवळच प्रजनन झाले तर पुढच्या काळात मासळी चांगल्या प्रमाणात मिळते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याचे गांभीर्य लक्षात घेवून याबाबतचे आदेश शासनस्तरावर दिले आहेत.