शहरं
Join us  
Trending Stories
1
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
2
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
3
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
5
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
6
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
7
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
8
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयोवृद्ध बॅटर
9
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
10
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
11
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
12
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
13
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 
14
Rohit Sharma Records, IND vs NZ 1st Test: रोहित शर्माचे फक्त ५ षटकार अन् बनणार भारताचा 'सिक्सर किंग'; या दिग्गजाचा विक्रम धोक्यात
15
Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     
16
आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...
17
निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
18
100 KM वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या आपत्कालीन खिडकीतून चिमुकली बाहेर उडून पडली; पुढे...
19
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी 
20
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे

पर्यटकांना भुरळ घालणारा रघुवीर घाट, रसाळगड पर्यटनासाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 7:13 PM

रघुवीर घाट हा पावसाळ्यामधील मोठे पर्यटन स्थळ आहे.

खेड : रत्नागिरी व सातारा जिल्हा यांना जोडणारा व खेड तालुक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाटात दरड काेसळण्याचे प्रकार घडत आहेत. तर रसाळगड भागात रस्ता गतवर्षी खचला हाेता. त्यामुळे रघुवीर घाट व रसाळगड पर्यटकांसाठी प्रशासनाने १ जुलैपासून पुढील दोन महिन्यांसाठी बंद केला आहे.

तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यामधील मोठे पर्यटन स्थळ आहे. या घाटामध्ये खेड तालुक्यातील तसेच बाहेरील अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी जुलै महिन्यापासून हजेरी लावतात. या घाटात पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे, थंड वातावरण व धुक्याची दाट चादर यासारख्या अनेक वैशिष्ट्यांनी पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते.मात्र, या घाटाचा रस्ता हा गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे खचला असून, त्यामुळे चालत्या वाहनांवर दगड कोसळण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनांचा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तसेच काही पर्यटक हे घाटामध्ये मद्यप्राशन करतात, त्यामुळे तिथे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होऊन भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे.

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला रसाळगड ही पावसाळी पर्यटनासाठी साहसी पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. मात्र, घेरा रसाळगड ते रसाळगड किल्ला जोडणारा रस्ता गतवर्षीच्या पावसाळ्यात खचण्याचे प्रकार घडले होते. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव याबाबतचे लेखी आदेश उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी संबंधित यंत्रणांना पाठवले आहेत.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील सुमारे वीस ते पंचवीस लहान-मोठी गावे ही भौगोलिक व रस्ता मार्गाने खेड शहर व तालुक्याशी जोडली गेली आहेत. या भागातील ग्रामस्थांना दैनंदिन अत्यावश्यक कारणांसाठी रघुवीर घाटातून प्रवास करण्यास सवलत देण्यात आली आहे. - राजश्री मोरे, उपविभागीय अधिकारी, खेड

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन