शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
3
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
4
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
5
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
6
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
7
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
8
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
9
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
10
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
11
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
12
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
13
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
14
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
15
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
16
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
17
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
18
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
19
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
20
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर

रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 2:05 PM

दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची उडाली धावपळ

रत्नागिरी : पाऊस जाणार, जाणार असे सांगितले जात असतानाच पावसाचा मुक्काम आणखी वाढला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत कडकडीत ऊन पडलेले असतानाच सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे साऱ्यांचीच त्रेधातिरपीट उडाली होती. जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, चिपळूण, खेड परिसरात पावसाने हजेरी लावली होती.परतीचा पाऊस जिल्ह्यात सातत्याने हजेरी लावत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४३०६.२२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. पावसामुळे तयार झालेले भात, नाचणी कापणी करण्यास समस्या निर्माण होत आहे. काही शेतकरी सकाळी कापलेले भात सायंकाळी घरी आणत आहेत. वाळविण्यास ठेवलेले भात शेतातच भिजत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शुक्रवारी सकाळी कडकडीत ऊन होते.सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर झाल्याने काहीजण मुलांसह खरेदीसाठी बाजारात गेले होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे साऱ्यांची धावपळ उडाली. बाजारात फटाके, फराळ, रांगोळी, पणत्या, आकाशकंदील विक्रीसाठी लावलेले स्टॉल प्लास्टिक टाकून झाकण्यात आले. प्लास्टिक बंदी असल्याने आकाशकंदील, फटाके, कपडे व अन्य साहित्य ठेवण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांची घाई उडाली होती. दोन तासांनंतर पाऊस थांबला तरी ढगाळ हवामान असल्याने पाऊस पुन्हा येण्याची शक्यता असल्याने अनेक ग्राहकांनी बाजारातून काढता पाय घेतला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस