शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले; खेड, राजापूर, संगमेश्वरात पूरस्थिती, जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 15:53 IST

जगबुडी नदीचे पाणी धाेका पातळीच्या वर

रत्नागिरी : जिल्ह्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाचा शनिवारी मध्यरात्रीपासून जाेर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी, चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडीचे पाणी धाेका पातळीच्या वर पाेहाेचले असून, रविवारी सायंकाळी नदीची पाणीपातळी ९ मीटरपर्यंत हाेती. त्याचबराेबर काजळी नदी (१७.७८ मीटर), अर्जुना नदी (६.३० मीटर), शास्त्री नदी (७ मीटर) आणि मुचकुंदी नदी (४ मीटर)चे पाणी इशारा पातळीच्या वर आले हाेते.राजापुरातील अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी शहरातील शिवाजी पुतळ्यापर्यंत आले हाेते. लांजा तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीची पाणीपातळी वाढल्याने त्याचा फटका रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी, चांदेराई, इब्राहिमपट्टणम आणि हातिस या भागाला बसला. हरचिरी आणि चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने या भागातील वाहतूक बंद पडली हाेती. तसेच संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीचे पाणी वाढल्याने माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले हाेते. तालुक्यातील अन्य भागांमध्येही रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली हाेती.चिपळूणमधील वशिष्ठी नदीचे पाणीही सायंकाळी वाढले हाेते. तसेच गुहागर आणि दापाेली तालुक्यांनाही पावसाने झाेडपून काढले. मंडणगड तालुक्यातील भाेळवली लघुपाटबंधारे याेजना पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून व विमाेचकातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नगरपंचायत हद्दीतील गांधी चाैक येथील फरशी पुलाजवळील रस्ता खचल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.

पुराच्या पाण्यात वाहून मृत्यूखेड तालुक्यातील चिंचवली चव्हाणवाडी येथील रामचंद्र सखाराम पवार (६२, रा. चिंचवली, चव्हाणवाडी) हे १८ जुलै राेजी सायंकाळी पाच वाजता प्रात:विधीसाठी नदीवर गेले हाेते. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीच्या पाण्यात पडून वाहून गेले. शनिवारी (२० जुलै) दुपारी तीन वाजता त्यांचा मृतदेह बाेरघर - ब्राह्मणवाडी येथे विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळील नदीकिनारी झुडपात सापडला.

नवीन पुलाला भगदाडमुंबई-गाेवा महामार्गावरील खेड-भरणे नाका येथील जगबुडी नदीवर बांधलेल्या नवीन पुलाला भगदाड पडल्याचे रविवारी सायंकाळी लक्षात आले. हा प्रकार काही रिक्षाचालकांच्या लक्षात आला. या प्रकारानंतर या ठिकाणी पाेलिस तैनात करण्यात आले असून, मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसRajapurराजापुरKhedखेडfloodपूर