शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

मरेपर्यंत 'याच' मतदार संघासाठी काम करणार, राजन साळवींची स्पष्ट भूमिका

By मनोज मुळ्ये | Published: April 15, 2023 12:04 PM

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मंत्री उदय सामंत यांच्यासमोर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदर साळवी यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.

रत्नागिरी : ज्यावेळी मी राजापूर - लांजा मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, त्याचवेळी मी शपथ घेतली होती की जिंकलो किंवा हरलो तरी मरेपर्यंत याच मतदार संघासाठी कार्यरत राहीन. त्यामुळे मी अन्य कोणत्या मतदार संघातून लढण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मंत्री उदय सामंत यांच्यासमोर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदर साळवी यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. रत्नागिरी ही आपली जन्मभूमी आहे. शिवसेनेमुळे आपल्याला नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हाप्रमुख अशा पदांवर काम करण्याची संधी मिळाली. 

२००६ साली झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपण राजापुरातून प्रथम निवडणूक लढवली. त्याचवेळी आपण तिथल्या मातीची शपथ घेतली आहे. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. पण खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून काम सुरू ठेवले. त्यामुळेच २००९, २०१४ आणि २०१९ ला मतदारांनी मला निवडून दिले. आता मतदार संघ बदलण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

पक्षाने आदेश दिल्यास जबाबदारी घेणार का, असा प्रश्न करण्यात आला असता ते म्हणाले की, पक्षादेशाला मी बांधिल आहे. पण जिथे मी आतापर्यंत निवडणूक जिंकलो आहे, जिथे मतदारांना जिंकले आहे, जिथे मी पक्ष वाढवला आहे, तिथेच मला पक्षप्रमुख संधी देतील, याबाबत मला विश्वास आहे. देशातील तपास यंत्रणांचा कितीही वापर झाला तरी महाविकास आघाडी त्याला बधणार नाही, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवी