शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

राजापूर पोलिसांनी मागितली माफी

By admin | Published: March 02, 2015 11:03 PM

बोगस दाखले प्रकरण : तहसीलदारांना दिले पत्र, ताब्यात घेतलेला दस्तऐवज परत

राजापूर : बोगस दाखले प्रकरणाचा तपास करताना सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तहसीलदारांची कोणतीही परवानगी न घेता राजापूर पोलिसांनी नेलेला दस्तऐवज अखेर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करताच रितसर पत्रान्वये पुन्हा राजापूर तहसीलदारांकडे जमा केला आहे. मात्र, या दस्तऐवजात काही बदल झाला असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राजापूर पोलिसांचीच राहील, असे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी स्पष्ट केले आहे.प्रांतांचे सील वापरुन खोट्या सह्या करून बोगस दाखले दिल्याचे प्रकरण गेले तीन आठवडे राजापुरात चांगलेच गाजत आहे. मात्र, पोलिसांच्या तपासावर सर्वसामान्यांमधून शंका व्यक्त करण्यात येत होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना तालुक्यातील सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोस्टाव्दारे अज्ञाताने दोन बोगस दाखले पाठवले होते.या दाखल्यांवर राजापूर सेतू कार्यालयाचा लोगो असल्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना राजापूर पोलिसांनी आपला मोर्चा सेतू कार्यालयाकडे वळवला होता. अचानकपणे सेतू कार्यालयात तपासासाठी जाताना राजापूर पोलिसांनी याबाबतची कोणतीही कल्पना तहसीलदारांना दिली नव्हती. उलट राजापूर सेतू कार्यालयात विनापरवाना घुसून कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज हस्तगत केला गेला होता.या सर्व प्रकारामुळे राजापूरचे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी पोलिसांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत याबाबतची लेखी तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून समज येताच पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत तहसीलदारांच्या अपरोक्ष गेलेला सेतू कार्यालयातील दस्तऐवज पुन्हा आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही प्रकारे लेखी न देता तसे दस्तऐवज स्विकारण्यास राजापूर तहसीलदारानी स्पष्ट नकार दिला व अगोदर विनापरवाना गेलेला दस्तऐवज जबाबदार अधिकाऱ्यांच्या लेखी पत्रानिशी सादर करावा, असे फर्मावले. त्यामुळे हतबल झालेल्या राजापूर पोलिसांनी संबंधित दस्तऐवज अखेर लेखी पत्रानिशी राजापूर तहसीलदारांच्या ताब्यात देऊन आपली सुटका करून घेतली.दरम्यान, याप्रकरणी राजापूर पोलिसांना अन्य कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज हवे असल्यास त्यांना लेखी पत्रानंतर देण्यात येतील, तसेच याप्रकरणी सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब राजापूर पोलिसांनी आपल्यासमोर घेण्यात यावेत, असे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. (प्रतिनिधी)