शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

राम मंदिर आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले : उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Published: January 22, 2024 3:28 PM

रत्नागिरी : राम मंदिर ही आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे. अयाेध्येतील ...

रत्नागिरी : राम मंदिर ही आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे. अयाेध्येतील हा अभूतपूर्व साेहळा रत्नागिरीतील नागरिकांनाही पाहता यावा यासाठी थेट प्रेक्षपणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामुळे आपणही या क्षणाचे साक्षीदार बनलाे. रत्नागिरीचा हा पॅटर्न राज्यात नव्हे तर देशातही राबवला गेला, असे प्रतिपादन राज्याचे उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

असंख्य भारतीयांचे स्वप्न साकार होत असून, रामभक्तांसाठी आजचा दिवस उत्सवाचा असणार आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरु असताना तो अभूतपूर्व सोहळा मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या जनतेसमवेत जयेश मंगल कार्यालय येथे थेट पाहिला. यावेळी ते बाेलत हाेते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी अयोध्येतील हा अभूतपूर्व सोहळा जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवता यावा यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यासाठी रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. तो सोहळा त्यांनी जनतेसोबत उपस्थित राहून पाहिला.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, ॲड. राजशेखर मलुष्टे, बाळू साळवी, किशोर मोरे, अलिमिया काझी, प्रशांत सुर्वे, दीपक पवार, अभिजित गोडबोले, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, स्मितल पावसकर, वैभवी खेडेकर यांच्यासह अनेक रत्नागिरीकर उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतNarendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिर