शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी
3
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
4
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
5
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
6
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
8
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
9
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
10
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
11
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
13
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
14
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
15
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
16
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
17
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
18
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
19
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
20
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी

रत्नागिरी : थ्रीप्समुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा धोक्यात, बागायतदारही संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 12:48 PM

थ्रीप्सचा प्रादुर्भाव महागडी कीटकनाशके वापरूनही आटोक्यात येत नसल्याने बागायतदारही संकटात.

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा हातात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, थ्रीप्सचा प्रादुर्भाव महागडी कीटकनाशके वापरूनही आटोक्यात येत नसल्याने बागायतदारही संकटात आहेत.

यावर्षी सर्वाधिक पालवीचे प्रमाण राहिले. ८० टक्के पालवी असल्याने शेतकरी पालवी कडक होऊन मोहर येण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे थंडी पडलीच नाही. पहिल्या टप्प्यातील आंबा पीक दहा टक्केच होते. हा आंबा तयार होऊन बाजारात आला आहे. हा आंबा अल्प प्रमाणात आहे. १५०० ते ४५०० रूपये पेटी दराने विक्री सुरू आहे. एप्रिल अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात असला तरी याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मोहरच आला नाही. शेवटच्या टप्प्यात असलेल्या मोहराला फळधारणा झाली. मात्र, हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला. तुडतुड्यामुळे मोहर काळवंडला असून, थ्रीप्समुळे फळाचा आकार चिकू एवढा होऊन फळ गळही वाढली आहे.

संशोधन करणे आवश्यकमहागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही थ्रीप्स आटोक्यात येत नसल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा हातातून निसटला आहे. आतापर्यंत पीक वाचविण्यासाठी केला खर्च वाया गेल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. थ्रीप्स आटोक्यात न आल्यास पुढील वर्षीच्या उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. याबाबत कृषी विभागाकडून संशोधन करणे आवश्यक आहे.थ्रीप्समुळे आंबा उत्पादन धोक्यात आले आहे. बाजारात थ्रीप्स प्रतिबंधात्मक कीटकनाशके उपलब्ध आहेत. महागडी कीटकनाशकांची फवारणी करूनही अपेक्षित फरक दिसत नाहीत. त्यामुळे कृषी विद्यापीठाने थ्रीप्सबाबत संशोधन करून प्रतिबंधात्मक कीटकनाशक बाजारात आणणे आवश्यक आहे.राजन कदमबागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा