शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Ratnagiri: आधी वडील, मग आई आणि दोन मुले, एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता, दापोलीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 12:09 IST

Ratnagiri:  रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ आहे यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

- शिवाजी गोरे

रत्नागिरीरत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ आहे यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी दापोली पोलिसांनी एक नियुक्त केले असून त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

2 जुलै रोजी दापोली तालूक्यातील विसापूर  गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (34) हा दुपारी 2.30 च्या सुमारास बेपत्ता झाला.दुसऱ्याच दिवशी 3 जुलै रोजी भरत भेलेकर याची पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी 9.30 च्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते असे सांगून आराध्य ( 7) व श्री (4) या आपल्या मुलांना  मुगीज शाळा नंबर 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेत घेवून जाते सांगून घरातून निघून गेली तीसुध्दा अद्याप परतलीच नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भरत याला घरातून निघून जाण्याची सवय आहे तो यापूर्वी पण असाच बेपत्ता झाला होता पण यावेळी पत्नी व दोन लहान मुले ही बेपत्ता झाल्याने सगळेच नातेवाईक व ग्रामस्थ चिंतेत असून शोशोध सुरू आहे.

या सगळ्या खळबळजनक प्रकाराचा छडा लावण्यासाठी पोलीसांसमोर हे मोठा आव्हान आहे. उपनिरीक्षक दर्जाचे नेतृत्वाखाली नेमण्यात आलेले पथक या कुटुंबाच्या शोधार्थ रवाना झाले आहे लवकरच काही माहिती हाती मिळेल असा विश्वास पोलिसांना आहे. मात्र या प्रकरणी अद्यापतरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची तर नाही ना ? याचाही तपास पोलिसांनी युध्दपातळीवर सुरू केला आहे. 

दापोली तालूक्यातील विसापूर  गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (34) हा दुपारी 2.30 च्या सुमारास त्याचा चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर यांच्यासोबत मंडणगड तालूक्यातील कुंबळे या ठिकाणी लाकडी पट्टी आणणे करीता जात आहे असे सांगून घरातून निघून गेला. तो अदयापपर्यंत घरी आलेलाच नाही. दुकानात जातो असे सांगून निघून गेलेल्या भरत भेलेकरचा कुटूंबासह नातेवाई मित्र मंडळीनी सर्वत्र शोध घेवून देखील तो कुठेच न सापल्यामुळे अखेर दापोली पोलीस ठाण्यात  भरत भेलेकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. भरत भेलकर नापत्ता झाल्याच्या नेमके दुस-याच दिवशी 3 जुलै रोजी भरत भेलेकर याची  पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी 9.30 च्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते असे सांगून आराध्य ( 7) व श्री (4) या आपल्या मुलांना  मुगीज शाळा नंबर 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी घेवून घरातून निघून गेली तीसुध्दा परत सायंकाळपर्यंत आपल्या घरी पुन्हा  परतलीच नाही.

आराध्य व श्री या चिमुकल्यांचा तसेच  सुगंधा हिचा सगळीकडे शोध घेण्यात आला मात्र ते तिघेही सापडलेले नाहीत तिच्या नातेवाईक व मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली मात्र त्यांचा कोठेही  ठावठिकाणा लागलाच नाही. दूरध्वनीवरही संपर्क  केला गेला मात्र  संपर्कच होत  नसल्यामुळे अखेर सुगंधा भेलेकर बेपत्ता झाल्याची तर आराध्य व श्री या दोघा लहान बालकांचे अपहरण झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.असुन अज्ञात संशयीतांवर भा.द.वि.क. 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळया प्रकरणी घटनेतील प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहा्ययक पोलीस फौजदार मिलींद चव्हाण हे  करत आहेत. तालुका पोलीस निरीक्षक श्री. अहिरे यांनी यासाठी खास एका पथकाची नियुक्ती केली आहे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFamilyपरिवारMissingबेपत्ता होणं