शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
3
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
4
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
5
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
6
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
7
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
8
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
9
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
10
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
11
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
12
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
13
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
14
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
15
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
16
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
17
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
18
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी

Ratnagiri: राजापुरात पूर, महामार्गावर साठले पाणी

By मनोज मुळ्ये | Published: July 07, 2024 5:10 PM

Ratnagiri Rain News: मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरात पूर आला आहे. शनिवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीचे पाणी जवाहर चौकात आले आहे. महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातीवले येथे पाणीच पाणी झाले आहे.

राजापूर - मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरात पूर आला आहे. शनिवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीचे पाणी जवाहर चौकात आले आहे. महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातीवले येथे पाणीच पाणी झाले आहे. महामार्गावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी ही समस्या उद्भवली आहे.

गेले दोन-तीन दिवस राजापूर तालुक्यात मुसळधार पावसाने ठाण मांडले आहे. शनिवारी दिवसभर पडत असलेला पाऊस रात्रीही कायम असल्याने रविवारी सकाळी अर्जुना नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली. दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान नदीचे पाणी शहरातील जवाहर चौकात आले. पावसाचा जैर आधिक असल्याने व्यापाऱ्यांनी आधीच दुकानातील सामानाची हलवाहलवी केली.

शहरात पाणी भरत असतानाच महामार्गावरही पाणीच पाणी झाले होते. महामार्ग रुंदीकरणांमध्ये राजापूर तालुक्यातील हातीवले येथे टोल नाका उभारण्यात आला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने पाणी साठत आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान हातिवले टोलनाक्यानजीकही पाणीच पाणी झाले होते. वाहनचालकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत होती. पावसाचा जोर कायम राहिला तर या भागातील वाहतूक काही काळ थांबवून ठेवावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस