शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

Ratnagiri news: मुख्यमंत्र्यांची सभा झाली ओके, एसटीला मिळाले उत्पन्नाचे खोके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 6:59 PM

सभेची माणसे मतदार संघातीलच असल्याचे सांगण्यासाठी एस.टी. बसेसचा वापर अधिक उपयुक्त

रत्नागिरी : गेला काही काळ उत्पन्नासाठी झगडणाऱ्या आणि सतत तोटा होणाऱ्या एस.टी.ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेडमधील सभेमुळे थोडा हातभार लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सभेसाठी जिल्ह्याच्या पाच आगारांतून १०८ बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. या बसेसमुळे सभेला गर्दी झाली आणि एस.टी.ला तब्बल १४ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळाले. राजकारणात कुणाला खोके मिळाले असोत किंवा नसोत, पण ही सभा ओके झाल्यामुळे तोट्यातील एस.टी.ला उत्पन्नाचे खोके मिळाले आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांची रविवारी खेडमध्ये झालेली सभा केवळ जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे लक्ष लागलेली ठरली. ५ मार्चला उद्धव ठाकरे यांनी ज्या मैदानात सभा घेतली, त्याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार, असे जाहीर करण्यात आल्याने आधीपासूनच या सभेबाबत मोठी उत्सुकता होती. विशेषत: सभेला लोक येणार की नाही, आले तर ते उद्धव ठाकरं यांच्या सभेपेक्षा कमी असतील की जास्त याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या.या सभेला प्राधान्याने खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांतील म्हणजेच आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघातील जास्तीत जास्त लोक यावेत, असे नियोजन करण्यात आले होते. त्यांच्यासह अन्य तालुक्यातील शिवसैनिकही सभेसाठी उपस्थित राहणार असल्याने या लोकांची ने आण करण्यासाठी एस. टी. बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. त्यासाठी रविवारी पाच आगारांतून १०८ गाड्या सभेसाठी सोडण्यात आल्या. त्यामुळे रत्नागिरी विभागाला साडेचाैदा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.खासगी गाड्यांसह एसटीच्या गाड्यांचा आधार घेण्यात आल्याने एस.टी.लाही थोडा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, देवरुख आगारातून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. सभेसाठी वेळेवर सोडणे व सभा संंपल्यानंतर पुन्हा आणून सोडण्याची जबाबदारी होती. प्रत्येक आगारातून माणसांच्या संख्येनुसार गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. दापोली आगारातून ३१, खेड २५, चिपळूण २७, रत्नागिरी ९ व देवरुख आगारातून सहा बसेस सोडण्यात आल्या होत्या. एकूण १०८ एस.टी. बसेसमुळे रत्नागिरी विभागाला साडेचाैदा लाख रुपये मिळाले आहेत.एस. टी. आरक्षणात असाही फायदाकोणत्याही राजकिय सभेला बाहेरून माणसे आणल्याचा आरोप केला जातो. सभेच्या गर्दीचा दावा खोडण्यासाठी हा फंडा हमखास वापरला जातो. अशावेळी माणसे स्थानिकच होती, हे सिद्ध करायची वेळ आली तर एस.टी.चे आरक्षण अधिक उपयुक्त ठरते. बसेस कोणकोणत्या भागातून आल्या याचे रेकॉर्ड आपोआप मिळते. त्यामुळे आमच्या सभेची माणसे मतदार संघातीलच असल्याचे सांगण्यासाठी एस.टी. बसेसचा वापर अधिक उपयुक्त आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे