शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

रत्नागिरी : पॅकेज, जादा मोबदल्याचे आमिष : अशोक वालम , आंदोलकांच्या अंगावर प्रकल्पसमर्थक, दलालांना सोडले जातेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 5:53 PM

रिफायनरी प्रकल्पाला आमचा प्रखर विरोध असतानाही शासनातर्फे पॅकेज व वाढीव मोबदल्याच्या नावाखाली प्रकल्पसमर्थक व दलालांना आंदोलकांच्या अंगावर सोडले जात आहे. जे आंदोलक त्यांचे ऐकत नाहीत, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचा डाव असल्याचा संशय कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी राजापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देपॅकेज, जादा मोबदल्याचे आमिष : अशोक वालम आंदोलकांच्या अंगावर प्रकल्पसमर्थक, दलालांना सोडले जातेय

राजापूर : रिफायनरी प्रकल्पाला आमचा प्रखर विरोध असतानाही शासनातर्फे पॅकेज व वाढीव मोबदल्याच्या नावाखाली प्रकल्पसमर्थक व दलालांना आंदोलकांच्या अंगावर सोडले जात आहे. जे आंदोलक त्यांचे ऐकत नाहीत, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचा डाव असल्याचा संशय कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी राजापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.रिफायनरीविरोधात सुरु असलेला लढा यापुढेही एकजुटीने कायम ठेवू व हा विनाशकारी प्रकल्प रद्द करायला शासनाला भाग पाडू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार रणकंदन सुरु असून, यापूर्वी रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल कंपनीच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन रिफायनरी प्रकल्प कसा चांगला आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न झाला होता.

त्या पार्श्वभूमीवर कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समिती व शेतकरी, मच्छीमार संघटनेच्या वतीने राजापुरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शासनाच्या भूमिकेवर टीका केली.कोकणचा नाश होऊ नये, यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच प्रकल्पाला प्राणपणाने विरोध करीत आहोत. त्यातूनच मागील काही दिवसात या प्रकल्पाविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. आम्हाला कोणताही मोबदला किंवा पॅकेज नको आहे. आमच्या कोकणला अशा विनाशकारी प्रकल्पांपासून वाचवायचे आहे, अशा शब्दात वालम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.प्रकल्पग्रस्त १४ गावांतील ४२ हजार ५०० खातेदारांना बत्तीस दोनच्या नोटीस पाठवण्यात आल्या. पण, त्यातील अनेक खातेदारांना अद्याप नोटीसच मिळालेल्या नाहीत. मलादेखील ती मिळालेली नाही. एकाच खातेदाराला तर अनेक नोटीस देण्यात आल्या आहेत. गोठीवरे परिसरातील तीन खातेदारांना तब्बल सहाशेपेक्षा अधिक नोटीस धाडण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.

 

 

 

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार