शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

सायकल मॅरेथॉनमधून धावले रत्नागिरीकर, पहिल्याच रॅलीत ४०० जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 13:14 IST

रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या विद्यमाने रत्नागिरीत पहिली सायकल मॅरेथॉन झाली. या सायकल मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी व १०० रत्नागिरीकर सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसायकल मॅरेथॉनमधून धावले रत्नागिरीकर पहिल्याच रॅलीत ४०० जणांचा समावेश

रत्नागिरी : रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या विद्यमाने रविवारी रत्नागिरीत पहिली सायकल मॅरेथॉन झाली. या सायकल मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी व १०० रत्नागिरीकर सहभागी झाले होते.

मॅरेथॉन स्पर्धेसाठी आयटीआय- शिवाजीनगर ते हातखंबा व परत शिवाजीनगर हा मार्ग निश्चित करण्यात आला होता. आरोग्यवर्धक आणि इंधनाची बचत करणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सायकल मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी, नागरिक उत्स्फूर्तरित्या सहभागी झाले होते.

अशाप्रकारचा उपक्रम दोन महिन्यातून एकदा तरी आयोजित करण्यात यावा, अशी अपेक्षा यावेळी नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होती. आयटीआय मार्गावरील मंगळवार आठवडा बाजार येथे या मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी ६ वाजता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी झेंडा दाखवला व शंभर नागरिकांनी हातखंब्याकडे कूच केली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ३०० विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉनचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याहस्ते करण्यात आले. रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य धरमसी चौहान यांनी या मॅरेथॉनला झेंडा दाखवला.शिवाजीनगर ते हातखंबा या मॅरेथॉन मार्गावर रिकामा टेम्पो, वैद्यकीय व्यवस्था, रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. याशिवाय मार्गावर एनर्जी ड्रिंक, पाणी देण्याची व्यवस्था दहा ठिकाणी करण्यात आली होती. त्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सायकलस्वारांसाठी साळवी स्टॉप येथील चिरायू हॉस्पिटल शेजारील स्टॉलवर पाणी, बिस्कीटे व एनर्जी ड्रिंकची सुविधा करण्यात आली होती.सायकल ट्रॅक उभारारत्नागिरी शहरात दुचाकी, चारचाकी व रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रस्त्याने जाताना सायकलस्वारांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. याकरिता शहरातील रस्त्यांवर स्वतंत्र सायकल ट्रॅक उभारावा, अशी विनंती वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्याला सहमती दर्शवत नव्या रस्त्यांवर अशी सुविधा देण्याचा मानस असल्याचे सांगितले.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनRatnagiriरत्नागिरी