शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रत्नागिरी : जिल्ह्यात बंधाऱ्यांचे काम केवळ चाळीस टक्केच पूर्ण,कामे संथ गतीने सुरु, उद्दिष्ट पूर्ततेसाठी करावी लागणार धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 11:36 IST

रत्नागिरी जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरु असून, दोन महिन्यांच्या कालावधीत ३६६९ बंधारे उभारण्यात आले आहेत. उद्दिष्टानुसार हे काम केवळ ४० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे बंधाºयांची कामे संथ गतीने सुरु असून, यंदा उद्दिष्टपूर्ती होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे- मिशन बंधारे - उद्दिष्ट पूर्ततेसाठी करावी लागणार धावपळ बंधाºयांच्या पाण्यावर पिकविला जातो भाजीपालाबंधारे उभारण्यासाठी शासनाची दमडीही खर्च केली जात नाहीवनराई, विजय, कच्चे ओहोळ, नाल्यांमधील आटू लागले पाणीलोकसहभागातून उभारले जाताहेत बंधारे.

रत्नागिरी : जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरु असून, दोन महिन्यांच्या कालावधीत ३६६९ बंधारे उभारण्यात आले आहेत. उद्दिष्टानुसार हे काम केवळ ४० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांची कामे संथ गतीने सुरु असून, यंदा उद्दिष्टपूर्ती होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.महाराष्ट्रात सर्वांत जास्त पाऊस पडूनही जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई उद्भवते. कारण येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनीवाटे नदी, नाले, समुद्राला जाऊन मिळते. या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषदेकडून त्यावर पावसाळ्यानंतर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ८४५० वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे.जिल्ह्यात गावोगावी वनराई, विजय आणि कच्चे बंधारे उभारण्याच्या मोहिमेचा दोन महिन्यांपूर्वी शुभारंभ करण्यात आला होता. या बंधाऱ्यांच्या कामांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थीवर्ग, शिक्षक, ग्रामसेवक व कृषी विभागाचे अधिकारी सहभागी झाले आहेत. 

बंधारे उभारण्यासाठी खासगी कंपन्यांनी जिल्हा परिषदेला साहित्याचा पुरवठा केला आहे. त्यामुळे शासनाचा एकही पैसा खर्च न करता खासगी कंपन्यांकडून देण्यात आलेल्या साहित्याचा वापर काही ठिकाणी बंधारे उभारण्यासाठी करण्यात येत आहे.दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ३६६९ बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. यामध्ये राजापूर तालुक्याला १०१० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना केवळ २४५ बंधारे पूर्ण करण्यात आले असून, ही संख्या अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. त्याचबरोबर चिपळूण तालुक्याला १३०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना ४४१ बंधारे उभारण्यात आलेले आहेत. 

दापोली तालुक्याला १०६० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असून, ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच ७४२ बंधारे उभारले आहेत. अशा प्रकारे बंधाऱ्यांची कामे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावे, वाड्यांवर सुरु आहेत. या बंधाऱ्यांमध्ये वनराई बंधारे - ८००, विजय बंधारे - ११३६ व कच्चे बंधारे - १७३३ अशी वर्गवारी आहे.या बंधाऱ्यांच्या पाण्यावर दरवर्षी भाजीपाला निर्मिती करुन उत्पन्न घेण्यात येते. त्यामुळे बंधाऱ्यांच्या पाण्यावर शेतकरी आर्थिक फायदा घेतात. त्याचबरोबर या बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या विहिरी, विंधन विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याने त्यामुळे तेथे उन्हाळ्यामध्ये कमी प्रमाणात पाणीटंचाई भेडसावते.

जिल्हा परिषदेने प्रत्येक ग्रामपंचायतीला बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये ओहोळ, नाले, नद्या नसल्याने त्या ग्रामपंचायती बंधारे कुठे उभारणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणचे पाणी आटण्याच्या स्थिती असल्याने बंधाऱ्यांची उद्दिष्टपूर्ती होणे अशक्य आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJalyukt Shivarजलयुक्त शिवार