शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

रिफायनरी प्रकल्प काेणत्याही परिस्थितीत घालवू देणार नाही, नीलेश राणेंनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 6:50 PM

राजापुरात येणाऱ्या रिफायनरीचे जोरदार स्वागत केले. मागील पाच वर्षे रिफायनरी प्रकल्पातील वादामुळे रखडला होता

राजापूर : तालुक्यात आलेला करोडोंची उलाढाल असणारा रिफायनरी प्रकल्प काेणत्याही परिस्थितीत घालवू देणार नाही. त्यासाठी सज्ज व्हा, कुठल्याही परिस्थितीत रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच मार्गी लागेल, अशा शब्दात भाजपचे सचिव नीलेश राणे यांनी सांगितले.

राजापूर शहरातील श्रीमंगल कार्यालयात भाजपतर्फे रविवारी रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते बाेलत हाेते. या मेळाव्याला माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, ॲड. विलास पाटणे, संतोष गांगण, उल्का विश्वासराव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजापुरात येणाऱ्या रिफायनरीचे जोरदार स्वागत केले. मागील पाच वर्षे रिफायनरी प्रकल्पातील वादामुळे रखडला होता. मात्र आता परिस्थिती खूप बदलली आहे. प्रकल्पाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. भविष्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील प्रत्येक गावातील बेरोजगारांना या प्रकल्पातून रोजगार मिळतील. त्यामुळे या प्रकल्पाच्या बाजूने कोकणी माणसाने राहिले पाहिजे, अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.

पूर्वी राजापूर हे जिल्ह्याचे मुख्य ठाणे होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राजापूर तालुका रिफायनरी प्रकल्पामुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बनणार आहे. कोकणचे भवितव्य उज्ज्वल असताना दुसरीकडे काही नतद्रष्ट मंडळी कोकणी जनतेला चुकीचे मार्गदर्शन करताना त्यांची माथी भडकविण्याचे काम करीत आहेत. अशा मंडळींना त्यांची जागा दाखविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन नीलेश राणे यांनी केले.राजापूर तालुक्यातच रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणार हे निश्चित असून त्यासाठी सज्ज व्हा, आपल्यासमवेत या, कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास नीलेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, ॲड. विलास पाटणे यांनी मनोगत व्यक्त केले. रिफायनरी प्रकल्प कसा उपयुक्त ठरेल ते सर्वांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पNilesh Raneनिलेश राणे