शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
3
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
4
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
5
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
6
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
7
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
8
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
9
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
10
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
11
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
12
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
13
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
14
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
15
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
16
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
17
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
18
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
19
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
20
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं

Ratnagiri: पावसामुळे मातीचा भराव रस्त्यावर, परशुराम घाटातील वाहतूक बंद; वाहनांच्या लांबच लांब रांगा 

By संदीप बांद्रे | Published: May 09, 2023 11:49 AM

मार्गावरील वाहतूक पहाटे पाच वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच वळीव पावसाने हजेरी लावली. यामुळे परशुराम घाटात भरावाची माती महामार्गावर आल्याने मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पहाटे पाच वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली आहे.महामार्गावरील परशुराम घाटात सध्या दुपारी १२ ते सायंकाळी ५ यावेळेत वाहतूक बंद ठेवून चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र, काल रात्रीपासून चिपळूण तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भरावातील माती रस्त्यावर आली आहे. त्यामुळे हा रस्ता पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहाटे पाच वाजल्यापासून परशुराम घाट आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतूक जाम झाली आहे. खेड आणि चिपळूण दोन्ही दिशेला मुंबई - गोवा महामार्गावर आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

बसेस, ट्रक चिखलात अडकली घाटात मातीमुळे निर्माण झालेल्या चिखल हटवण्यासाठी पुढील काही तास लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माती महामार्गावर आल्यामुळे बसेस तसेच ट्रक घाटामध्ये या चिखलात अडकली आहेत. या मार्गावरील वाहतूक चिरणीमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसTrafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्ग