शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

संगमेश्वरालाही पावसाने झोपडल

By admin | Published: March 03, 2015 9:11 PM

बागायतदार हवालदिल : आंबा, काजूवर मोठा परिणाम शक्य

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार धास्तावला आहे. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचा मोहोर गळून पडला आहे. परिणामी बागायतदारांची चिंता वाढली आहे.तालुक्यात गेले अनेक दिवस उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच ढगाळ व मळभी वातावरण असल्याने पावसाची शक्यता होती. अखेर शनिवारी व रविवारी अवकाळी पावसाने आपले जोरदार आगमन करीत दाणादाण उडवून दिली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली, तर प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला.दुसरीकडे आंबा व काजू पिकाला पोषक वातावरण असल्याने आंबा व काजूला चांगला मोहोर धरला होता. मोहोरामुळे आंबा व काजूची कलमे अक्षरश: फुलून गेली होती. यावर्षी मोठ्या प्रमाणावर मोहोर धरल्याने तालुक्यातील आंबा व काजू बागायतदार यंदा चांगले उत्पन्न मिळेल या आशेने आनंदात होते. मात्र, गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे मोहोर गळून पडल्याने आंबा व काजू बागायतदार चिंताग्रस्त बनला आहे. अवकाळी पावसाने बागायतदारांच्या आशेवर जणू विरजण टाकले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने आंबा व काजू बागायतदारांचा पुरता अपेक्षाभंग झाला आहे.संगमेश्वर तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार कोसळलेल्या ्अवकाळी पावसामुळे शेतकरी, बागायतदारांचे नुकसान होत ्आहे. तालुक्यात गेले अनेक महिने हे वातावरण असून त्याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषिअधिकाऱ्यांकडे संपर्क साधला होता. मात्र, आता अधिक लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)काजू पिकाला पोषक वातावरण असल्यामुळे यावर्षी चांगला मोहोर आला होता. काजू पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे काजू पिकाचा मोहोर संपूर्ण गळून पडला असून, काजू पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. बागायतदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.- अशोक अणेराव,आंगवली, काजू बागायतदार