शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

शाळा लखलखणार सौर ऊर्जेन

By admin | Published: March 03, 2015 9:18 PM

जिल्हा परिषद : वीज बिलाची कटकट कायमची संपणारे

रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना वीज बिलांचा प्रश्न कायम सतावतो. त्यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना सौर होम लाईट सेट देण्यात येणार आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांचा वीजेचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये २७८६ प्राथमिक शाळा आहेत. यातील अनेक शाळा ग्रामीण व डोंगरळ, दुर्गम भागामध्ये आहे. काही शाळा अति दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये असल्याने त्या शाळा विद्युतीकरणापासून अजूनही दूर आहेत. कारण त्यांना महावितरणकडून अजूनही वीज पुरवठा करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना वीज बिल भरण्याचा प्रश्न आजही भेडसावत आहे. कारण, ४ टक्के सादिलच्या रक्कमेतून वीज बिले भरण्याचा खर्च करण्याचा शासनाकडून कोणताही आदेश किंवा परिपत्रक नसल्याने शाळांसमोर वीज बिलांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांकडून प्रशासनाला कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. वीज वाणिज्यीक दराने यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषद आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. तसेच महावितरणाला शाळांचे वीज बिल घरगुती दराने देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याबाबबत महावितरणने सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. वीज बिल थकीत असलेल्या प्राथमिक शाळांविरोधात महावितरणने मध्यंतरी शाळांचे वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटाच चालविला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा यांच्यामध्ये जोरदार चर्चा झाली होती. आतापर्यंत महावितरणने सुमारे २१३ प्राथमिक शाळांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे आजही या शाळा आंधारात आहेत. प्राथमिक शाळांमधील वीजेचा प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण समितीने त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून येणाऱ्या ४ टक्के सादिलमधून जिल्हा स्तरावरुन खर्च करून शाळांसाठी सौर होम लाईट सेट पुरविण्याचा निर्णय घेतला. त्याला मान्यताही मागील सभेत देण्यात आली होती. त्यामुळे भविष्यात शाळा महावितरणवर अवलंबून राहणार नाहीत. कारण जिल्हा परिषदेतील बहुतांश शाळांमध्ये सौर होम लाईट सेट पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांचा वीजेचा प्रश्नही कायमचा सुटणार आहे. वीज बिलाचीही कटकट राहणार नाही. (शहर वार्ताहर)सभेत मिळाली मान्यता...४ टक्के सादिल अनुदानापैकी जिल्हास्तरावर खर्च करणार.जिल्ह्यात आजही अनेक शाळा विद्युतीकरणापासून वंचित.आजही २१३ शाळांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडीत.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये २७८६ प्राथमिक शाळा.सौर ऊर्जा शाळांना पुरवण्याच्या कामाला मागील सभेत मिळाली मान्यता.