शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

..तर रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 14:02 IST

राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेत कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. येथील काही स्थानिकांच्या विरोधामुळे शिवसेनाही विरोधी भूमिकेत राहिली आहे.

रत्नागिरी : स्थानिक लोकांच्या मागणीवर शिवसेना अवलंबून आहे. स्थानिकांनी प्रकल्पाचे समर्थन केले तर त्याठिकाणी रिफायनरी होण्याबाबत शिवसेना सकारात्मक भूमिका घेईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी रिफायनरीला समर्थन दिल्याचे वक्तव्य केल्याने रिफायनरीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेत कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. येथील काही स्थानिकांच्या विरोधामुळे शिवसेनाही विरोधी भूमिकेत राहिली आहे.मात्र, या भागातील ग्रामस्थांनी रिफायनरीला पाठिंबा देत रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे शिवसेनाही आता एक पाऊल मागे आली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रिफायनरी प्रकल्प विदर्भात हलवावा, असे वक्तव्य केले आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत रिफायनरीबाबत सकारात्मक भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, स्थानिकांच्या मागणीवर शिवसेना अवलंबून असल्याचे वारंवार आम्ही सांगितले आहे.स्थानिकांनी प्रकल्पाचे समर्थन केल्यास रिफायनरी होण्याबाबत शिवसेना सकारात्मक भूमिका घेईल. रिफायनरीबाबत लोकांमधील गैरसमज दूर केले पाहिजेत. जे नकारात्मक आहेत, त्यांना सकारात्मक केले पाहिजे. चांगली पॅकेजीस दिली पाहिजेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.रिफायनरीबाबत शिवसेनेने युटर्न घेतला आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मंत्री उदय सामंत म्हणाले की, यात युटर्न कसला? आम्ही सुरुवातीपासून लोकांसोबत राहिलो आहोत. लोकांनी जर प्रकल्पाचे समर्थन केले तर शिवसेना लोकांच्या मागणीचा आदर करेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतRajapurराजापुरShiv Senaशिवसेना