शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

चिपळूणची ‘लालपरी’ चार दिवसांनी पश्चिम महाराष्ट्रात, मराठा आंदोलनामुळे वाहतूक होती ठप्प

By संदीप बांद्रे | Updated: November 4, 2023 18:56 IST

आगाराचे लाखोंचे नुकसान

चिपळूण : मराठा आरक्षणाच्या मुद्दयांवरून चिघळलेल्या आंदोलनामुळे चिपळूण आगारातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारी बस वाहतूक रद्द करण्यात आली होती. दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांनी गुरूवारी उपोषण स्थगित केल्यानंतर ठिकठिकाणचे तणावपूर्ण वातावरण शांत झाले आहे. त्यामुळे रद्द केलेली बससेवा शुक्रवारपासून सुरळीत करण्यात आली आहे. वाहतूक सेवा सुरू झाल्याने तब्बल चार दिवसांनी चिपळुणातून पश्चिम महाराष्ट्रात लालपरी धावली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपाेषण सुरू हाेते. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनामुळे एसटीची तोडफोड, दगडफेक होऊन नुकसान होऊ नये यासाठी सोमवारपासून चिपळूण आगारातून सुटणाऱ्या अक्कलकोट, बीड, बेळगाव या मार्गावरच्या पाच फेऱ्या बंद केल्या होत्या. तर मंगळवारीही या फेऱ्यांबरोबरच पुणे, मिरज, सातारा, कराड, कवठेमहाकांळ, जत आदी १० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. चार दिवस या बस फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे २,८६० किलोमीटरचे मार्ग कमी झाले. परिणामी, चिपळूण आगाराला मोठा आर्थिक फटका बसला.

पोफळीच्या पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटी बसेस बंद झाल्याने प्रवासीही खोळंबले. या मार्गावर प्रवास करणारे अनेक प्रवासी चिपळुणात अडकून होते. त्यांना खासगी वाहनांच्या आधारे प्रवास करावा लागला. शुक्रवारपासून या बंद असलेल्या सर्व फेऱ्या पूर्ववत करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणMaratha Reservationमराठा आरक्षण