शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेचा शांततेत प्रारंभ

By admin | Published: March 03, 2015 9:23 PM

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार यावर्षीपासून प्रथमच साडे दहाला विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यात आले.

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षचा आजपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागीय शिक्षण मंडळातून ४१,५५५ विद्यार्थी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. सकाळी दहा वाजल्यापासूनच पालक, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती.दहावीच्या परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे २७,९७७ विद्यार्थी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३,५७८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. परीक्षा संचलन सुनियोजित पद्धतीने पार पडावे, यासाठी दोन्ही जिल्ह्यात २१ परीरक्षक कार्यालये, तर १०३ परीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात १३ परीरक्षक केंद्र व ६४ परीक्षा केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ परीरक्षक केंद्र व ३९ परीक्षा केंद्र निर्माण करण्यात आली आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात तालुकानिहाय परीक्षा केंद्रामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १४ केंद्र, चिपळूण तालुक्यात ११, खेडमध्ये ९, गुहागरात ५, दापोलीत ७, लांजा तालुक्यात २, संगमेश्वरमध्ये ७, राजापुरात ६ तर मंडणगड तालुक्यात ३ परीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात ६ केंद्र, मालवणमध्ये ५, वेंगुर्ला तालुक्यात ३, सावंतवाडीत ७, कुडाळ तालुक्यात ७, कणकवलीत ७, दोडामार्ग तालुक्यात २, तर वैभववाडी तालुक्यात २ परीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. अशा पद्धतीने दोन्ही जिल्ह्यात एकूण १०३ परीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळून एकूण १४ भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच ५ मंडळ सदस्यांची केंद्र भेटीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण मंडळाकडून प्रत्येक पथकाला गोपनीय नियोजन करुन देण्यात आले आहे.शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार यावर्षीपासून प्रथमच साडे दहाला विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यात आले. परीक्षेपूर्वी १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आला. साडेदहाला वर्गात जायचे असल्याने १० वाजेपासून परीक्षा केंद्रावर पालक, विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच वर्गात सोडण्यात येत होते. पहिलाच मराठीचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण दिसून येत होता. मात्र पेपर सुटल्यानंतर विद्यार्थी आनंदात बाहेर पडले, तेव्हा पेपर सोपा गेल्याचे चेहऱ्यावरून दिसून येत होते. (प्रतिनिधी)