शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

महामार्गावर हाड वैद्याचा नवा उद्योग सुरू करा, आदित्य ठाकरेंचा उद्योगमंत्र्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 4:50 PM

ठाकरे सरकारने कठीण काळातही राज्यातील सामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सुमारे ८० हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला.

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मानेचा पट्टा लावूनच प्रवास करायला हवा. उद्योगमंत्र्यांना सुचवावेसे वाटते की, अन्य उद्योग सुरू करण्यापेक्षा महामार्गावर हाड वैद्य, लेप वैद्य व मानेचा पट्टा विकणाऱ्यांचा नवा उद्योग सुरू करावा, असा सल्ला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चिपळुणातील सभेत दिला.

शिवसेनेतर्फे सुरू असलेल्या शिव संवाद निष्ठा यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांची चिपळुणातील ओझरवाडी येथील शिवसेना शहरप्रमुखांच्या कार्यालयासमोर जाहीर सभा झाली. यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव, उपनेते राजन साळवी, आमदार वैभव नाईक, ॲड. अनिल परब, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाळा कदम, शहरप्रमुख उमेश सकपाळ उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, कोकणातील महामार्गाची परिस्थिती वर्षानुवर्षे कायम असून, ती आता बदलली पाहिजे. ठाकरे सरकारने कठीण काळातही राज्यातील सामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सुमारे ८० हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला. महिलांसाठी वेगवेगळे आपण काही गोष्टी आणत होतो. गेल्या अडीच वर्षांमध्ये साधारण साडेसहा लाख कोटी एवढी गुंतवणूक आणली. हिंमत असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत आणि निवडणुकीला सामोरे जावे. मीही शिवसेनेतून एकटा राजीनामा देतो आणि वरळीतून पुन्हा विजय मिळवून दाखवतो, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा उल्लेख न करताच त्यांच्यावर टीका करताना म्हणाले, हॅपकिन हा मोठा वैज्ञानिक होता. त्यांच्या नावाने मोठी संस्था आहे. परंतु, आपल्या आरोग्यमंत्र्यांना तो दलाल वाटतो. नशीब त्यांना खेकडा वाटला नाही. नाहीतर खेकडा वाटला असता तर इथल्या धरणावर आले असते. इथल्या धरणाची अजून खोलवर चौकशी केली असती तर खेकडेच काय आणखी काय काय बाहेर आले असते, असा टोलाही लगावला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंत