शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात

By admin | Published: March 02, 2015 10:58 PM

पालघर जिल्ह्णात पडलेल्या अवेळी पावसासोबत वाऱ्याचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी मच्छीमारांच्या नुकसानीचे प्रमाण कमी असले तरी सरासरी वीस मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

चिपळूण : ग्रंथालय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यंत अल्प वेतनावर अर्धपोटी काम करावे लागत आहे. ग्रंथांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अन्य खर्चातही वाढ होत आहे. मात्र, त्यामानाने ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ होत नाही. ग्रंथालयांना अच्छे दिन येणार कधी, असा प्रश्न या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.ग्रंथालयांसाठी मागील शासनाने ५० टक्के अनुदान वाढ केल्याचे जाहीर केले होते. पण, ती चक्क फसवणूक होती. ग्रंथालयाच्या कामातील किरकोळ त्रुटी दाखवून वाढलेले अनुदान रोखण्यात आले होते. अनेक ग्रंथालये बंद केली, काहींची वर्ग अवनती केली. आज पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अनेक ग्रंथपाल ७ ते ८ हजार रुपये वेतनालाही महाग झाले आहेत. शासन बदलले आता अनुदानात वाढ होईल आणि ग्रंथालयांना अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मार्च महिना उजाडला तरी अनुदानाचा दुसरा हप्ता आलेला नाही. पहिल्या हप्त्यात पूर्ण ५० टक्के रक्कम मिळालेली नाही ती केवळ ३५ टक्केच मिळाली. अनुदान नाही तर वेतन व ग्रंथ खरेदी कशी करायची, असा प्रश्न संचालकांना भेडसावतो. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ग्रंथालय चळवळीशी संबंधित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले वाचक आहेत. ते ग्रंथालयांच्या समस्या समजून घेऊन मार्ग काढतील, अशी अपेक्षा ग्रंथालय क्षेत्रातील संचालक व कर्मचाऱ्यांना आहे. माजी मुख्यमंत्री विलास देशमुख यांनी शतक पार केलेल्या ग्रंथालयांना पाच लाखांचे अनुदान दिले होते. या मुख्यमंत्र्यांनीही असेच अनुदान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे केलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी केले आहे. ग्रंथालयांना शासनाने अनुदान वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.राज्यातील ग्रंथालयांच्या प्रश्नांवर अनेकवेळा विविध लढे देण्यात आले. मात्र, अशा ग्रंथालयांना अनेक प्रश्नांवर केवळ आश्वासनांपलिकडे काहीच प्राप्त झाले नाही. त्यामुळे अशा ग्रंथालयांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. राज्यात अनेक ग्रंथालयांची स्थिती नाजूक असून, अशा ग्रंथालयांना प्रगती करण्यासाठी अनेक योजनांचा पाठपरावा करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)