शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
3
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
4
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
5
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
6
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
7
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
8
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
9
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
10
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
11
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
12
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
13
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
14
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
15
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
16
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
17
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
18
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...
19
"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका
20
Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र चमकली; पाहा नवे दर

आंब्यासाठी अद्याप १५ दिवसांची प्रतीक्षा, सर्वसामान्यांसाठी हापूसची चव कडूच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 2:52 PM

१५ दिवसांनी बाजारात आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वसामान्यांना हापूसचा आस्वाद मे मध्येच घेता येणार आहे.

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर झाल्याने एप्रिल, मे महिना आंब्याचा हंगाम असतानाही बाजारात किरकोळ प्रमाणात आंबा उपलब्ध आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये केवळ २० ते २२ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी येत आहेत. आंब्याचे प्रमाण कमी असल्याने अजूनही दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. १५ दिवसांनी बाजारात आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वसामान्यांना हापूसचा आस्वाद मे मध्येच घेता येणार आहे.

सध्या बाजारात आंबा किरकोळ प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे. वाशी मार्केटमध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांतून २० ते २२ हजार पेट्या इतकाच आंबा विक्रीला जात आहे. दरवर्षी याचवेळी ८० हजार ते एक लाख पेट्या विक्रीला जातात. मात्र, यावर्षी उत्पादन कमी झाल्याने आंबा कमी आहे. आंब्यासाठी मागणी चांगली आहे, त्यामुळे सध्या तरी वाशी मार्केटमध्ये येणारा आंबा हातोहात संपत आहे.

अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, नीचांकी तापमान याचा परिणाम आंबा पिकावर झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. पहिल्या टप्प्यातील माेहराचा आंबा अत्यल्प होता, तो संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंब्याची पुनर्माेहरामुळे गळ झाली. तिसऱ्या टप्प्यात मोहर खूप होता. मात्र, अपेक्षित फळधारणा झाली नाही. चाैथ्या टप्प्यातील आंबा अद्याप तयार झालेला नाही. हा आंबा तयार होऊन बाजारात येईपर्यंत एप्रिल संपेल, अशी शक्यता बागायतदारांकडून वर्तविण्यात येत आहे.

दरवर्षी वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक या दिवसात मोठ्या प्रमाणावर असते. आवक वाढली की, दर गडगडतात. यावर्षी एकूणच आंबा कमी असल्याने दर अधिक आहे. ते सर्वसामान्यांसाठी परवडणारे नाहीत. मे महिन्यात आंब्याची आवक वाढल्यानंतर मुंबई मार्केटमधून सुरत, राजकोट, गुजरात, अहमदाबाद, पुणे, कोल्हापूर, सांगली मार्केटमध्ये आंबा विक्रीला पाठविला जाण्याची अपेक्षा आहे. आखाती प्रदेश व अन्य देशांत निर्यात होऊ शकते. मात्र, कोकणातून जाणाऱ्या आंब्याचे प्रमाणच कमी आहे. यावर्षी आंबा कमी असल्याने शेवटपर्यंत दर टिकतील, अशी अपेक्षा बागायतदार व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा