शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
3
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
4
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
5
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
6
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?
7
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
8
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
9
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
10
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
11
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
12
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
13
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
14
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
15
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
17
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
18
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
19
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
20
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?

कोकण रेल्वेत महिलेचा संशयास्पद मृत्यू, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 12:17 PM

रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला

चिपळूण : कोकण रेल्वेमार्गावरील सावंतवाडी दिवा पॅसेंजरमध्ये लांजातील एका प्रवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२३ मार्च) दुपारी येथे घडली. या घटनेचा रेल्वे पोलिसांनी पंचनामा केला असून, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही.सावंतवाडी दिवा पॅसेंजर रेल्वेगाडीने मुंबईकडे ही महिला जात होती. प्रवासात संगमेश्वरदरम्यान अचानक तिच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर चिपळूणजवळ येताच अतिवेदना होऊ लागल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर रेल्वेच्या आरोग्य यंत्रणेला सांगण्यात आले. चिपळूण रेल्वेस्थानकात गाडी पोहोचताच आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केली. मात्र, त्या महिलेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून काही रेल्वे प्रवाशांनी गोंधळ घालत रेल्वेच्या आरोग्य यंत्रणेवर आक्षेप घेतला. याचवेळी तेथे रेल्वेचे डॉ. शिरीष मदार पोहाेचले. त्यांनी तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला. या घटनेचा रेल्वे पोलिसांनी पंचनामा केला आहे. मात्र, महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संबंधित महिलेचा आधीच मृत्यू झाला होता. परंतु, मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. या घटनेवेळी प्रवाशांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य न करता विनाकारण गोंधळ घातला. एवढेच नव्हे, तर रेल्वे पोलिसांनी बोलावलेली रुग्णवाहिका एका प्रवाशाने फोन लावून रद्द केली. -डाॅ. शिरीष मदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वेDeathमृत्यू