शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

रत्नागिरीत शिवराय, शंभूराजे, पंढरपूरच्या विठोबा यांचे उंच पुतळे उभारण्यात येणार

By शोभना कांबळे | Updated: September 2, 2023 18:48 IST

रत्नागिरी : रत्नदूर्ग (भगवती) किल्ला येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम सुरू झालेले आहे. यात शिवाजी महाराज यांचा २४ ...

रत्नागिरी : रत्नदूर्ग (भगवती) किल्ला येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम सुरू झालेले आहे. यात शिवाजी महाराज यांचा २४ फुटी उभा पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच थिबा पॅलेस येथे संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर आषाढी आणि कार्तिकीला रत्नागिरी जिल्ह्यातून ढरपूरला भक्त जातात, त्यामुळे पंढरपूरच्या विठोबाची सर्वाधिक उंच मुर्तीही रत्नागिरी शहरात उभारण्यात येणार आहे. तसेच संसारे गार्डनमध्ये ध्यान केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिली.पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी रत्नदूर्ग (भगवती) किल्ला येथे भेट देऊन उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी केली व आढावा घेतला. तसेच संसारे गार्डन येथे आठ कोटी खर्चातून उभारण्यात येणाऱ्या ध्यान केंद्राच्या ठिकाणाचीही पाहणी केली. याबाबत तात्काळ आराखडा तयार करुन लवकरात लवकर निविदा प्रक्रीया पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती, त्यांनी दिली. संभाजीराजे यांचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुतळा तयार झाला आहे. तो थिबा पॅलेस येथे उभा रहातोय, त्याचे प्रेझेंटेशन देण्यात आले आहे. तसेच पंढरपूरच्या विठोबाची देखील महाराष्ट्रातील सर्वात उंच मुर्ती रत्नागिरी शहरात होतेय, त्याचीदेखील जागा निश्चित झाली आहे. पैसे देखील वर्ग केले आहेत. या सगळ्या गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.मार्लेश्वर, भाट्ये याठिकाणी प्रत्येकी पाच कोटी रूपये खर्च करून या पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. पर्यटकांचीही चांगली सोय करणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले.रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे खड्डे पडले आहेत. तेही दुरूस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसोबतही बैठक झाली. गणपतीच्या आधी पूर्ण कोकणातील एक लेन सुरू होईल, अशा दृष्टीने सार्वजनिक बांधकाम काम करतेय, त्याचाही आढावा घेतला असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतtourismपर्यटन