शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

परीक्षा घेणारेच पेपर फाेडतात; मग विश्वास ठेवायचा काेणावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 11:50 IST

टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून, परिषदेचा कारभार मनस्ताप वाढवणारा ठरला आहे.

मेहरुन नाकाडे

रत्त्नागिरी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा परिषदेतर्फे भावी शिक्षकांसाठीपरीक्षा घेण्यात येते. वास्तविक कोरोनामुळे दीड वर्ष लांबलेली परीक्षा घेण्यात आली; परंतु परीक्षा घेणाऱ्यांनीच पेपरफुटीचा घोळ घातल्याने भावी शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून, परिषदेचा कारभार मनस्ताप वाढवणारा ठरला आहे.

शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी टीईटी परीक्षा सक्तीची आहे. ही परीक्षा कोरोनामुळे दीड वर्ष लांबली. पेपर क्रमांक १ चे गणित व पेपर क्रमांक २ चे मानसशास्त्र कठीण होते. एकूणच परीक्षा घेताना काठिण्यपातळी राखली गेली. परीक्षेचा निकालही दोन ते तीन टक्के लावला जातो. त्यामुळे परीक्षा पास होणे हे दिव्य असल्याने विद्यार्थी त्याच्यासाठी अथक परिश्रम घेतात; परंतु पेपरफुटीचा घोटाळा बाहेर आल्यामुळे आतापर्यंत विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया गेले आहेत.

परीक्षा पध्दतीवरील विश्वास कमी होत आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी यापुढे परीक्षा द्यावी का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापुढे परीक्षा पध्दतीच रद्द करून रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.

दीड वर्षानंतर परीक्षा, त्यातही घाेळ

टीईटी परीक्षेत पेपरफुटीमधील घोटाळा उघडकीस आला असल्याने भविष्यात परीक्षा परिषदेवरील विश्वास कमी होऊ लागला आहे.

कोरोनामुळे लांबलेली परीक्षा गेल्या महिन्यात झाली; परंतु परीक्षेतील काठिण्यपातळी राखली गेली. गणित व मानसशास्त्र विषयातील प्रश्न कठीण असल्याने विद्यार्थ्यांना घाम फुटला होता.

जिल्ह्याचा विस्तार पाहता, दोन स्वतंत्र केंद्र ठेवण्याऐवजी एकच केंद्र ठेवले, त्यात उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पेपरला बसता आले नसल्याने नुकसान झाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षाTeacherशिक्षक