शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By मनोज मुळ्ये | Published: August 09, 2024 6:32 PM

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात जे आंदोलन केले गेले, त्यातील राजकीय व सामाजिक गुन्हे मागे ...

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात जे आंदोलन केले गेले, त्यातील राजकीय व सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. असे नेमके किती गुन्हे आहेत, याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक लवकरच तयार करतील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी मंत्री सामंत यांनी बारसू तसेच नाणार येथील आंदोलकांचे नेते तसेच ग्रामस्थांसमवेत चर्चा केली. नाणारमध्ये होऊ घातलेल्या बॉक्साईट उत्खननाबाबत ही चर्चा होती. याचवेळी प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. जोपर्यंत ग्रामस्थांशी चर्चा होत नाही, तोपर्यंत सरकार कोणताही प्रकल्प लादणार नाही, कसलीही बळजबरी केली जाणार नाही, अशी भूमिका मंत्री सामंत यांनी पुन्हा एकदा मांडली.बारसूमध्ये झालेल्या आंदाेलनानंतर अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यातील जे गुन्हे राजकीय व सामाजिक विषयांसाठीचे आहेत, ते गुन्हे मागे घेण्यात येतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. किती ग्रामस्थांवर, कोणत्या प्रकारचे, किती गुन्हे दाखल आहेत, याची माहिती काढण्याची सूचना आपण जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना केली आहे. त्यांचा अहवाल तयार झाल्यानंतर पुढील प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे ते म्हणाले.या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह रिफायनरी आंदोलकांचे नेते अशोक वालम, अमोल गोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ हजर होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पagitationआंदोलनUday Samantउदय सामंत