शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
2
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
3
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
4
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
5
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
6
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
7
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
8
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
9
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
10
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
11
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
12
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
13
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
14
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
16
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
17
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
18
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
19
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
20
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?

तिवरे धरण दुर्घटनेतील बाधित कुटुंबीय आजही घरांच्या प्रतीक्षेत, एसआयटीच्या चौकशी अहवालावर कारवाईच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 7:01 PM

तिवरे दुर्घटनेत आई-वडिलांसह आपल्या संपूर्ण कुटुंबाला मुकलेला रूद्र चव्हाण हा मावशीकडे पेठमाप येथे आल्यामुळे वाचला होता. तो तिवरे गावापासून अलिप्त राहत असला तरी आजही आई, वडील व बहिणीच्या आठवणीने त्याचे मन दाटून येते.

चिपळूण : तीन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलेल्या तिवरे धरण दुर्घटनेतील बाधित कुटुंबीयांपैकी निम्म्या कुटुंबीयांना हक्काची घरेच मिळालेली नाहीत. वर्षभरापूर्वी पाठवलेल्या प्रस्तावावरही कार्यवाही झालेली नाही. परिणामी मुंबई, पुण्यात राहणाऱ्या कुटुंबीयांना अलोरेतील प्रकल्पात मिळाली असली, तरी १८ स्थानिक कुटुंबीयांना अद्याप घर मिळालेले नाही. एसआयटीच्या चौकशी अहवालावर कोणतीही कारवाई न करता विभागीय चौकशीची मात्रा देण्यात आली. त्यातच धरण उभारणीलाही मुहूर्त सापडलेला नाही.

तिवरे ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार अ, ब, क, ड अशी वर्गवारी असलेली एकूण ४२ घरांची नोंद सापडली. त्यावरून ४२ कुटुंबांची पुनर्वसन यादी तयार करताना मूळ कुटुंब मालक जिवंत असतानाच यादीमध्ये मात्र ते मृत म्हणून नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आता ४२ पैकी २४ कुटुंबांना अलोरे येथे पुनर्वसन प्रकल्पात घरे बांधून देण्यात आली. परंतु, अजूनही १८ कुटुंबीयांना घरे मिळणे बाकी असून, ही घरे तिवरे गावातच प्रस्तावित आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून तो लालफितीत अडकल्याचे चित्र आहे.

रूद्रला येते आई, वडील, बहिणीची आठवण

तिवरे दुर्घटनेत आई-वडिलांसह आपल्या संपूर्ण कुटुंबाला मुकलेला रूद्र चव्हाण हा मावशीकडे पेठमाप येथे आल्यामुळे वाचला होता. सद्यस्थितीत तो शहरातील एका शाळेत दुसरीत शिकत आहे. तो तिवरे गावापासून अलिप्त राहत असला तरी आजही आई, वडील व बहिणीच्या आठवणीने त्याचे मन दाटून येते.

कंटेनर बनले निवारा केंद्र

तिवरे धरण दुर्घटनेत कंटेनरमध्ये धरणग्रस्तांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली होती. आता कंटेनरमधील धरणग्रस्तांचे अलोरे प्रकल्पात पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे सध्या येथील कंटेनर आपत्कालीन स्थितीत निवारा केंद्र म्हणून वापरण्याचे नियोजन आहे.

दुर्घटनेला आज तीन वर्ष झाली तरी स्थानिकांना न्याय मिळालेला नाही. अलोरेतील प्रकल्पात लॉटरी पद्धतीने दिलेल्या घरांमध्ये बहुतांशी मुंबई, पुण्यात राहणारेच अधिक आहे. त्यामध्ये गावातील कुटुंबीयांचा समावेश फार कमी आहे. आता उर्वरित पुनर्वसन प्रकल्प तातडीने मार्गी लावणे गरजेचे असताना त्याकडे शासन डोळेझाक करत आहे. - अजित चव्हाण, तिवरे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण