शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

Ratnagiri: मिऱ्या बंधाऱ्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ पतन विभागावर धडकले

By शोभना कांबळे | Published: June 12, 2024 4:12 PM

रत्नागिरी : दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्यावासीयांच्या डोक्यावर उधाणाची भीती असते. त्यामुळे बंधाऱ्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. ...

रत्नागिरी : दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्यावासीयांच्या डोक्यावर उधाणाची भीती असते. त्यामुळे बंधाऱ्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मात्र, निधी मिळूनही मिऱ्या बंधाऱ्याच्या धोकादायक टप्प्याचे काम पावसाळा लागल्यावरही सुरू न झाल्यामुळे मिऱ्या ग्रामस्थांनी पत्तन विभागावर धडक देत गावचे संरक्षण करण्यासाठी बंधाऱ्याचे काम करण्याची मागणी केली. यावेळी पत्तन अधिकाऱ्यांनी यावर लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.मिऱ्या बंधाऱ्याचा पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा अडीचशे मीटरचा टप्पा अपूर्ण आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे साडेतीन किलाेमीटरचे काम करण्यात येणार आहे. मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर हा पक्का बंधारा बांधण्यात येत आहे. साडेतीन किलाेमीटरपैकी अडीचशे मीटरचे काम शिल्लक आहे.पत्तन विभागाने केलेल्या सर्वेक्षणामधील सात धोकादायक क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र आहे. समुद्राचा प्रवाह बदलला असल्यामुळे या भागात उधाणाच्या लाटांचा मोठा मारा बसतो. त्यामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन हे पाणी मानवी वस्तीत येण्याचा धोका निर्माण झाला आहे. पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतच्या टप्प्याचे काम करताना लागणाऱ्या यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेवरून वाद होता. जागा मालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. परंतु, त्याने आता संमती दिली असली तरी समुद्राला उधाण असल्याने बंधाऱ्याचे तळातून खोदकाम करून काम करणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतरच हे काम होण्याची शक्यता दिसत आहे.त्यामुळे पावसाळ्यातील संकटाचा सामना कसा करायचा, या भीतीच्या छायेखाली असलेल्या मिऱ्यावासीयांनी मंगळवारी पत्तन विभागाचे अधिकारी साळुंखे यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी साळुंखे यांनी संबंधित ठेकेदार आणि सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढण्याचे आश्वासन या ग्रामस्थांना दिले. यावेळी मिऱ्या गावातील ग्रामस्थ सुनील कांबळे, नागेश कांबळे, राजू भाटकर, छोट्या भाटकर, बाबू कांबळे, मनोज पानगले, अनिल पानगले, विजय तळेकर, मुरलीधर पन्हळेकर, दत्तगुरू कीर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणRainपाऊस