शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

Ratnagiri: राजापूरच्या नदीपात्रात भरतीचे पाणी आल्याने वाहने अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 14:31 IST

राजापूर : शहरातील खर्ली नदीपात्रात बुधवारी दुपारी अचानक आलेल्या भरतीच्या पाण्यामुळे काही चारचाकी वाहने अडकून पडली. कडकडीत उन्हाळ्यात कोरड्या ...

राजापूर : शहरातील खर्ली नदीपात्रात बुधवारी दुपारी अचानक आलेल्या भरतीच्या पाण्यामुळे काही चारचाकी वाहने अडकून पडली. कडकडीत उन्हाळ्यात कोरड्या झालेल्या नदीत अचानक पाणी आल्याने हा प्रकार घडला. वाहने बाहेर काढण्याचे प्रयत्नही अयशस्वी झाले. नदीला पाणी आल्याचे कळताच काठावर बघ्यांची गर्दी जमली.राजापूर शहरात दरवर्षी पावसाळी दिवसात हमखास पूर येतो आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होते. साधारण डिसेंबर महिन्यात या नदीतील पाणी कमी होते आणि तेव्हापासूनच बाजारपेठेत कामाला येणारे लोक आपल्या गाड्या नदीपात्रात लावून ठेवतात. मंगळवारी अमावस्या होती. अमावस्येला मोठी भरती येते. त्यामुळे बुधवारी भरतीचे पाणी नदीमध्ये आले आणि तेथे लावलेल्या अलिशान गाड्यांसह एक ट्रॅक्टर आणि एक माल वाहतुकीची मोठी गाडी, एक रिक्षा ही वाहने अडकून पडली.

पाणी वाढू लागल्यानंतर काठाजवळ असलेली काही वाहने बाहेर काढण्यात आली. मात्र भरतीच्या पाण्याने नदीपात्र व्यापल्याने त्यामध्ये पार्क केलेली अनेक वाहने अडकून पडली होती. त्यातील एकदोन वाहने बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. मात्र ते सफल झाले नाहीत. खर्ली नदीपात्रात भरतीचे पाणी भरल्याने वाहने अडकल्याची वार्ता शहरात पसरली आणि नदीच्या काठावर बघ्यांची गर्दी जमली.महापुराला लगाम घालण्यासाठी शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नदीपात्रात गतवर्षी गाळ उपसा करण्यात आला. त्यामुळे नदीचे पात्र चांगलेच रुंद झाले असल्याने भरतीच्या वेळीही झटपट पाणी भरत असल्याचा अनुभव आला. काही दिवसांपूर्वीही असेच भरतीचे पाणी आले होते व त्यावेळीही त्या पाण्यावर वाहने तरंगताना पाहायला मिळाली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरriverनदी